तेल्हारा : तालुक्यातील चारही भागातील रखडलेल्या रस्त्यांबाबत मार्ग काढण्यासंदर्भात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये रखडलेल्या रस्त्यांबाबत आमदार व नागरिकांमध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले निदान एक्साईट चा रस्ता चालन्या योग्य करून देण्याची मांगनी नागरिकांनी केली रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या सुधीर कंट्रक्शन चा ठेका रद्द झाल्यामुळे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी यापुढे रस्त्यांचे कामे लवकर सुरू करण्याबाबत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले .
तेल्हारा तालुक्यातील चारही भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांवर अनेक लहान मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या चार ते पाच वर्षाच्या कालावधीत रस्त्याची काम रेंगाळत असल्यामुळे नागरिकांनी व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारचे आंदोलन केले परंतु याची दखल शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेत नसल्यामुळे पुढील आंदोलन अधिक आक्रमक होऊ नये. हे लक्षात येताच आमदार प्रकाश भारसाकळे यांनी 14 ऑक्टोबरला विश्राम गृह तेल्हारा येथे बैठक घेऊन रस्त्यांबाबत ज्या लोकांनी पुढाकार घेऊन आंदोलने केली.
त्यांना बोलावून विस्तृत चर्चा केली यादरम्यान नागरिक व आमदारांमध्ये खडाजंगी सुद्धा झाल्याचे पहावयास मिळाले या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या भागातील रस्त्यांच्या कामाबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांनी गेली असता आमदार प्रकाश भारसाकळे यांनी रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या सुधीर कंट्रक्शन चा ठेका रद्द झाल्याचे सांगून यापुढे नवीन निविदा प्रक्रिया काढल्या जाईल व त्या माध्यमातून लवकरात लवकर कामे करून घेतल्या जाईल निविदा प्रक्रिया काढण्यात वेळ झालं तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालणे योग्य एक्साईट चा रस्ता करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सांगितले यावेळी पत्रकार विशाल नांदोकार यांनी पाच दिवस आमरण पोषण केले. त्या उपोषणाला मी भेट देऊ शकलो नाही, उपोषण सोडायला सुद्धा आलो नाही, कारण त्यावेळेस रस्त्याचे काम मार्गी लागणे शक्य नव्हते म्हणून मी येऊ शकलो नाही.
अशी कबुली आमदार प्रकाश भारसाकळे यांनी उपस्थित नागरिकांसमोर दिली यामुळे कोणीही आंदोलन करण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधावा मी पुढाकार घेईल असे आमदार भारसाकडे यांनी सांगितले दोन दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे यांनी लोटांगण आंदोलन केले होते. त्यांना सहकार्य म्हणून शिवसेना उपतालुका प्रमुख अजय गावंडे काँग्रेसचे संदीप खारोडे पत्रकार संदीप सोळंके व विशाल नांदोकार यांनी लोटांगण घेऊन सहभाग घेतला होता. अशा प्रकारचे अनेक आंदोलने अनेकांनी यापूर्वी केलेले आहे.
या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून एसटी महामंडळाने आपल्या अनेक बसेस बंद केल्या त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच काही दिवसांमध्येच शाळा कॉलेजेस सुरू होत असल्यामुळे सणासुदीचे दिवस असल्यामुळे एसटी बसेस सुरु होणे आवश्यक आहे. परंतु खड्ड्यात गेलेला रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही. तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणे अशक्य आहे. त्यामुळे सर्वप्रथम रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून एक्साईट चा रस्त्यावर मुरुम टाकून पूर्णपणे चालन्या योग्य करावा अशा प्रकारची ठोस मागणी उपस्थित नागरिकांनी केली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रखडलेल्या रस्त्यांच्या कामावरून खडाजंगी
तेल्हारा तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था होऊन रस्त्यांची वाट लागली व यामध्ये मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे सुरुवातीपासूनच या भागाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सुरुवातीपासून पुढाकार घेणे आवश्यक होते. आम्ही आमच्या मागण्या मांडाव्या तरी कुणापुढे अशाप्रकारे अनेक प्रश्नांचा भडिमार जनआंदोलन संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष एड. पवन शर्मा, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू मालिये, व तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी केला. व यापुढे ज्या ठेकेदाराला या रस्त्याचे काम मिळणार. त्या ठेकेदाराकडून लवकरात लवकर दर्जेदार काम करून घ्यावे असे सांगितले असता संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या किचकट विषामुळे रस्त्याचे कामे रेंगाळत राहिली परंतु यापुढे मी स्वतः रस्त्यांच्या कामात लक्ष देईल असे आश्वासन आमदार भारसाकळे यांनी दिले असता. काही वेळ आरोप-प्रत्यारोप होऊन वातावरण गरम झाले होते. हा सर्व प्रकार विश्रामगृह येथे मोठ्या पोलिस बंदोबस्तात झाला हे येथे उल्लेखनीय.