• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मुलांची Immunity चांगली, राज्यानं विशेष रणनीती आखून शाळा सुरु कराव्यात; AIIMSच्या संचालकांचा सल्ला

School Reopen: तिसऱ्या लाटेचा (Third Wave) लहान मुलांवर जास्त प्रार्दुभाव होणार असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याच कारणानं देशात अनलॉक (Unlock) प्रक्रियेनंतरही देशातील बऱ्याच शाळा अद्याप उघडण्यात आलेल्या नाही.

Team by Team
July 20, 2021
in राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
108 2
0
शाळेची घंटा आता कोण वाजवणार?; शाळेतील शिपाई पद आता रद्द
20
SHARES
787
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: देशातील कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट अद्याप गेलेलं नाही. कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा जरी दिवसेंदिवस कमी होत असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Pandemic) धोका वर्तवला आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा (Third Wave) लहान मुलांवर जास्त प्रार्दुभाव होणार असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याच कारणानं देशात अनलॉक (Unlock) प्रक्रियेनंतरही देशातील बऱ्याच शाळा अद्याप उघडण्यात आलेल्या नाही. अशातच एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया ( AIIMS Director Dr Randeep Guleria) यांनी शाळा सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.

तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असतानाही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पुन्हा शाळा सुरु करण्याचा सल्ला देत त्यासाठी विशेष रणनीती तयार करण्याचीही सूचना केली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

गेल्या वर्षीपासून शाळा बंद

सर्व राज्य सरकारने विशेष रणनीती (Reopen Schools) आखून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला पाहिजे, असंही डॉ. गुलेरिया म्हणाले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिलं लॉकडाऊन लागू केल्यापासून देशातील बर्‍याच राज्यात शाळा बंद आहेत आणि आता त्या राज्यांना शाळा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. विद्यार्थी घरी बसून अभ्यास करत आहेत. हळूहळू ऑनलाईनची प्रक्रिया सुरु केल्यानंतर केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगीही दिली होती. मात्र बर्‍याच राज्यात संसर्ग झाल्यानंतर, हा निर्णय मागे घेण्यात आला आणि शाळा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद पडल्या.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, डॉ गुलेरिया यांनी म्हटलं की, मी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी समर्थन देत आहे. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे फार कमी आहेत तेथे शाळा सुरु करण्यासाठी विचार केला पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे शाळा पुन्हा सुरू करता येतील.

मुलांमध्ये होणाऱ्या संसर्ग दराविषयी माहिती देताना एम्सचे संचालक म्हणाले की, देशात अशी फारच कमी मुलं आहेत ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. बहुतेक मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे. बर्‍याच मुलांमध्ये व्हायरसशी लढण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती देखील तयार झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Tags: School Reopen
Previous Post

आता लष्कराच्या जमीन सुद्धा विकल्या जाणार! २५० वर्षांपूर्वीचा कायदा मोदी सरकार बदलणार

Next Post

Arogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
LIC Jeevan Labh : प्रत्येक महिन्याला केवळ 800 रुपये गुंतवा अन् 5 लाख मिळवा, जाणून घ्या

Arogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था: ऑगस्ट महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.