अकोला (प्रतिनिधी)- प्रत्येक गावातील, शहरांतील जनतेचे प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असते आणि प्रशासनाचीही जबाबदारी नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची असतांनाच कृषी नगर भागात सोडले जाणारे पिण्याच्या पाण्याचा व्हॉल्व्ह हा चक्क घाण पाणी वाहून नेणाऱ्या नालीतच असल्याने अगदी सहजपणे लोकांना पिण्याचे पाणी सोबतच नालीचे पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे मनपा चे जलप्रदाय विभाग कृषीनगर भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळत असून हा खेळ त्वरित बंद करा अन्यथा रोगग्रस्त होऊन मरण्यापेक्षा मनपा विरोधात आंदोलन करून मरू अशी भूमिका कृषीनगर भागातील नागरिक तथा वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पुर्व उपाध्यक्ष अवधुत खडसे यांनी घेतली आहे यावेळी प्रकाश डहाने, विजय नरवाडे ,राजु अंबोरे वैदु समाज नेेते राहुल मनवर, विजय वानखडे,सतीष वानखडे, सुमेध खंडारे, महानंद राठोड, राजेष मनवर, भारत गवई ,धम्मपाल आठोले ,रामा तायडे विलास इंगोले आदीं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती