तेल्हारा – शहरातील देवानंद सुरेश तेलगोटे हा युवक आयआयटी होऊन यूपीएससी च्या परिक्षेकडे वळला ती कठीण परीक्षा सुद्धा देऊन उत्तीर्ण झाला व मुलाखती साठी पात्र ठरला मात्र अशातच त्याला कोरोना ने गाठले असता त्याला अकोला येथील खाजगी उपचारासाठी दाखल केले मात्र 80 टक्के फुफ्फुस निकामी झाले असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एअर अँबुल्स ने हैदराबाद येथे हलविले त्याला लागणारा खर्च एक करोड रुपये मित्रांनी हाक देताच जगभरातून मदत ट्रान्स्फर केली
देवानंद चे वडिल सुरेश तेलगोटे हे आर्मी मधून सेवानिवृत्त झाले मुलगा देवानंद हा हुशार असल्याने त्याला मुंबई येथील नामांकित आयआयटी कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला तेथुन त्याने केमिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण केले त्यावेळी अनेक त्याचे अनेक मित्रांनी जगातील विविध कंपन्यांमध्ये जॉब स्वीकारला मात्र देवानंद ला आयएएस व्हायचे असल्याने देवानंद ने देशातील सर्वांत कठीण असलेली भारतीय नागरी सेवा म्हणजे यूपीएससी ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये तो यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होवून मुलाखती साठी पात्र ठरला मात्र मुलाखत देण्यासाठी तो दिल्ली येथे जाण्यापूर्वीच त्याला कोरोना ने गाठले त्यावेळी देवानंद हा घरी परतलेला असल्याने त्याला अकोला येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले त्यावर घरच्या नातेवाईकानी लागणारा तीन ते चार लाख रुपये खर्च सुद्धा केला मात्र देवानंद चे फुफ्फुस हे 80 टक्के निकामी झाले असल्याने त्याला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्यासाठी जवळपास एक करोड खर्च बघता घरची परिस्थिती जमतेम असल्याने त्याच्या जिवलग मित्र सुमित कोठे याने देवानंद च्या तब्येत व परिस्थिती ची जाणीव मित्रांना करून दिली त्यावर मित्राच्या हाकेला मित्रांनी क्षणाचा ही विलंब न करता देवानंद ला त्याच्या मित्रांचा जगभरातुन मदतीचा ओघ सुरू झाला आणि रक्कम जमा झाली त्यावर तातडीने हैदराबाद येथील डॉक्टर शी तातडीने संपर्क साधल्या गेला व वेळेचे भान राखून एअर अँबुल्स ने देवानंद ला हैदराबाद येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला अकोला विमानतळावर एअर एम्बुल्स संध्याकाळ च्या सुमारास दाखल झाली असता देवानंद ला तातडीने हैदराबाद येथे हलविण्यात आले यावेळी त्याचे मित्र व नातेवाईक हजर असतांना देवानंद च्या तब्येतीची प्रार्थना करीत असल्याचा भावनिक क्षण सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेकांनी अनुभवला असता अनेकांचे मन भरून आले होते सद्या हेद्राबाद येथे उपचार सुरू आहेत.
इतिहासात होईल मैत्रीची नोंद
आजच्या काळात कोणी कोनाचे नाही अशी जरी समाजाची भावना झाली असेल परंतु देवानंद च्या मित्रांनी इतकी मोठी रक्कम क्षणाचा ही विलंब न लावता गोळा केली याला म्हणतात खरी मैत्री या मैत्री ने रक्ताच्या नात्यालाही मागे टाकले असल्याने इतिहासात या मैत्रीची नोंद होईल
नुकताच पातूर तालुक्यातील यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण प्राज्वल नाकट याला सुद्धा कोरोना होऊन त्याला हैदराबाद येथे हलविण्यात आले होते मात्र त्याची झुंज अपयशी ठरली आणि आता देवानंद ला सुद्धा हैदराबाद येथे हलविण्यात आले असल्याने जिल्ह्यातील एक युवक भारतीय नागरी सेवेत असावा अशी आशा जिल्हावासी करीत असल्याने देवानंद ठणठणीत होऊन परत येईल अशी अपेक्षा आहे