• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, November 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सिंचना करिता अगोदर पाईप लाईनची व्यवस्था करा नंतरच वान धरणाच्या पाण्याच्या उचल बाबत विचार व्हावा -अनिल गावंडे, अध्यक्ष लोकजागर मंच

Team by Team
December 4, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
92 1
0
सिंचना करिता अगोदर पाईप लाईनची व्यवस्था करा नंतरच वान धरणाच्या पाण्याच्या उचल बाबत विचार व्हावा -अनिल गावंडे, अध्यक्ष लोकजागर मंच
17
SHARES
663
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा :- सातपुडयाच्या कुशीत वसलेल्या व अकोल्या सह बुलठाणा वासियांचे लक्ष वेधुन घेणाऱ्या सर्वात यशस्वी म्हणून ज्या धरना कड़े पाहले जाते व सिंचनाचा मूळ उद्देश्य असलेल्या हनुमान सागर प्रकल्पातुन (वान धरण) मोठ्या प्रमाणात पाण्याची उचल होत असल्याने या भागातील शेतकरी बांधवांच्या सिंचनाचा प्रश्न उपस्थित होत आहे शासनाने अगोदर सिंचना साठी पाईप लाईनची व्यवस्था करावी तसेच धरणातील गाढ , होत असलेले बाष्पिभवन, पाण्याचा मोठ्या प्रमानातील होत असलेला अपव्यय , कर्मचाऱ्यानची कमतरता, नियोजन शून्य कारभार ई.कड़े लक्ष देऊन शेतकऱ्यांना सिंचना साठी किती पाण्याची आवश्यकता आहे त्या नंतर किती पानी शिल्लक राहते या बाबत शेतकरी बांधवाना सोबत घेऊन नियोजन केल्या नंतरच वान धरणातील पान्या चा इतर ठिकांनच्या बाबतीत विचार व्हावा असे लोकजागर मंच, आघाडी चे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी आपले मत व्यक्त केले .

हनुमान सागर प्रकल्प हा तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचनासाठी बांधण्यात आला या धरणाचा मुळ उद्देश हा सिंचन आहे . धरण बांधल्यानंतर धरणातील पाण्याची क्षमता ८४ .४३४ द.ल.घ.मी. आहे. त्यामधील दरवर्षी ३ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन तसेच ३ द.ल.घ.मी. पाण्याची धरणातून गळती होते त्यामुळे धरणामध्ये जिवंत साठा फक्त ७८.४३४ द.ल.घ.मी. इतका आहे. त्यामुळे मुळातच सिंचनाकरिता २७.७७२४ द.ल.घ.मी. इतक्या पाण्याची तुट आहे. वान धरणाचे निर्मितिवेळी धरणातील फक्त २२ टक्के पाणीच पिण्यासाठी प्रस्तावित होते. परंतु पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता शासनाने या धरणातून अकोट शाराकरिता ८.६६ द.ल.घ.मी., तेल्हारा शहराकरिता ३.१६ द.ल.घ.मी., जळगाव जा. शहराकरिता ४.०२ द.ल.घ.मी. ८४ खेडी योजने करिता ४.२३९ द.ल.घ.मी., शेगाव शहराकरिता ५.६२ द.ल.घ.मी. तसेच जळगाव तालुक्यातील खेड्यांकरिता ८.४५४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित झाले आहे आणि अकोला शहर अमृत योजने करिता २४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित झालेले आहे परंतु या योजनेला शासनाने तात्पुरती स्थगिती आलेली आहे तसेच तेल्हारा – अकोट मतदार संघातील १५९ खेडी योजना सुद्धा प्रस्तावित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते त्यामुळे धरणाचवरील सिंचनाच्या मुळ उद्देशाला बाधा पोहचत आहे .

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

वान धरनावर १२८ पैकी केवळ २० कर्मचारी काम पाहत आहेत कमी कर्मचाऱ्यान मुळे सिंचना कड़े दुर्लक्ष होत आहे व धरणाच्या सुरक्षाचा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे . तसेच शासना कडून कालवा साफसफाई बाबत निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे नादुरुस्त कालव्यान मधून दर रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे त्यामुळे शासनाने अगोदर सिंचना बाबत पाईप लाईनची व्यवस्था करने अत्यंत गरजेचे आहे . तसेच ज्या सिंचनाच्या उद्देशाने धरण निर्मीती केली त्यासाठी सर्व प्रथम लाभधारक शेतकऱ्यांची जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करावा , वान प्रकल्प पाणी वापर संस्थांचे पूर्नगठण जून्या नव्या शेतकऱ्यांना घेऊन नियोजन करावे .धरण निर्मीती पासून धरणातील गाळ काढला नाही, त्यामुळे गाळ काढल्याने पाणी संचय क्षमता वाढण्यास मदत होईल आदि बाबींचा विचार शासन स्तरावर होने आवश्यक आहे .

वान धरना बाबत अकोला येथील अमृत योजनेचा शासन निर्णय कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा तसेच बाळापुरच्या पिण्याचे पाण्याचा प्रस्ताव रद्द होऊन यापुढे पाईप लाईन सह तेल्हारा , अकोट , संग्रामपुर भागातील शेतकरी बांधवांच्या सिंचनाचा प्रश्न जो पर्यत परिपूर्णरित्या मार्गी लागत नाही तो पर्यंत इतर कोणताही प्रस्ताव वान धरणावरून अकोट मतदार संघा बाहेर जाता कामा नये अशी रोखठोक भूमिका लोकजागर मंच , आघाड़ीचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी माडली आहे.

Tags: लोकजागर मंचवान धरण
Previous Post

12 व 13 डिसेंबर रोजी राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन

Next Post

हिंदू खाटीक महासंघाच्या वतीने एमबीबीएस पात्र पल्लवी गोतरकार आणि आणि पत्रकार बांधवांचा सत्कार

RelatedPosts

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Next Post
हिंदू खाटीक महासंघाच्या वतीने एमबीबीएस पात्र  पल्लवी गोतरकार आणि आणि पत्रकार बांधवांचा सत्कार

हिंदू खाटीक महासंघाच्या वतीने एमबीबीएस पात्र पल्लवी गोतरकार आणि आणि पत्रकार बांधवांचा सत्कार

तळेगाव बाजार येथील आत्महत्या प्रकरणी मुलीच्या पालकांना सहायता निधीचा धनादेश सुपूर्द

तळेगाव बाजार येथील आत्महत्या प्रकरणी मुलीच्या पालकांना सहायता निधीचा धनादेश सुपूर्द

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.