• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘युरिया’ चा अनावश्यक वापर टाळा-कृषी विभागाचे आवाहन

Team by Team
August 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
युरिया
19
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सुद्धा युरीया खत वापराचे प्रमाण वाढले आहे. उडीद, मुंग, सोयाबीन, तुर ही पिके डाळवर्गीय आहेत. त्यांच्या मूळांवर जिवाणुच्या गाठी असतात. हे जिवाणु हवेतील नत्राचे स्थिरिकरण करुन सदर झाडाची नत्राची गरज काही प्रमाणात भागवतात. तसेच पेरणीच्या वेळेस आपण डिएपी 10:26:26 या सारख्या खतांची मात्रा दिलेली असते. त्यामुळे या डाळवर्गीय पिकांना युरीया (नत्र) आता देण्याची गरज नाही. आपले शेतातील पिक काही कारणामुळे जसे की, शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिवळे पडते. अशावेळी शेतकरी बांधव युरीयाचा सर्रास, मोठया प्रमाणावर वापर करतात. जास्त पाण्यात हा जमीनीत दिलेला युरीया पिकाच्या कामी येण्याऐवजी जमीनीत खोलवर पाझरुन लीचीग होऊन वाया जातो. अशावेळी 2 टक्के युरीयाची फवारणी पिकांवर केली तर ते तुलनात्मक दृष्टया अधिक फायदेशीर ठरते.

युरीयाच्या जास्त वापरामुळे पिकाची कायिक वाढ अधिक होते. विशेष करुन सोयाबीनमध्ये आपल्याला त्याचे परिणाम स्पष्ट दिसतात. पिक अगदी मांड्यापर्यंत वाढलेले, प्लॉट छान बसलेला दिसतो परंतु त्याप्रमाणात झाडाला फुले, शेंगा लागत नाहीत. यात अधिकची भर म्हणजे युरीयाच्या अतिवापरामुळे झाडाची पाने लुसलुशीत व मऊ होतात. टनकपणा, कणखरता कमी होतो ही तर किडीसाठी पर्वणीच ठरते. त्यामुळे अशा पिकावर किडींचा विशेष करुन रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होतो. पिक रोगांनाही बळी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे युरीयाच्या वापरानंतर 10 ते 15 दिवसांनी किटकनाशकांची फवारणी घ्यावीच लागते. परिणामी श्रम व उत्पादन खर्च विनाकारण वाढतो. कपाशी या पिकामध्ये पेरणीच्या वेळी दिलेल्या खताच्या मात्रा व्यतिरिक्त नत्राची आवशकता असते. तशी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाची शिफारसही आहे. परंतु कपाशी पिकात सुध्दा युरीयाचा अवाजवी अतिरेकी वापर केला तर त्याचे दुष्परिणाम दिसुन येतात.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्ह्यात अकोट व तेल्हारा तालुक्यातील काही भागांमध्ये केळीची लागवड होते. केळीसाठी नत्राची गरज आहे. तशी कृषि विद्यापिठाची शिफारसही आहे. परंतु या पिकामध्येही गरजेपेक्षा जास्त युरीयाचा वापर केला तर केळीची पाने लुसलुशीत, मऊ होऊन किड व रोगांना सहज बळी पडण्याची शक्यता असते. परिणामी उत्पादन खर्च वाढतो. नत्राची गरज युरीया व्यतिरिक्त अमोनियम सल्फेट यासारख्या खताव्दारे पुर्ण करता येऊ शकते विशेष म्हणजे अमोनियम सल्फेट या खतामध्ये नत्रा व्यतिरिक्त सल्फर हे महत्वाचे अन्नद्रव्य सुध्दा असते केळीसाठी सल्फर फायद्याचे असते. एकंदरीत युरीयाच्या अतिरिक्त वापरामुळे श्रम व उत्पादन खर्च तर वाढतोच सोबत शेतजमीनीतील गांडुळांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. युरीया खताच्या सतत संपर्कामुळे डर्मटीटिस सारखे त्वचारोग दिसून येते आहे. त्यामुळे केवळ स्वस्त मिळतो म्हणुन युरीयाचा अनावश्यक, अतिरिक्त वापर टाळुन आपले श्रम व उत्पादन खर्च कमी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

Tags: कपाशीचे क्षेत्रकृषीपिकयुरिया
Previous Post

महिला मोटार कॅब (ऑटोरिक्षा) परवानासाठी अर्ज आमंत्रित

Next Post

आज १५ जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यु, आकडा ३१२३ पार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
चाचणी

आज १५ जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यु, आकडा ३१२३ पार

रानभाजी महोत्सव

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पातूर अंतर्गत रानभाजी महोत्सव २०२० कार्यक्रम संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.