मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- – सामाजिक कार्यात अग्रणी असणारे यांचा विवाह 29 जुलै रोजी बासलापूर येथे संपन्न झाला विवाह च्या औचित्यवर आशुतोष व निकिताने अवयवदानाचा संकल्प करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला.
पुनर्जिवन फाउंडेशन परतवाडाच्या वतीने गेल्या 2ते 3 वर्षांपासून अवयवदानाची चळवळ शहरात राबविल्या जात असून अनेकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. पुनर्जिवन फाऊंडेशनच्या माध्यमातून दोन व्यक्तीनी मृत्यूनंतर अवयवदान करीत इतरांना जीवनदान दिले आहे.मृत्यूनंतर शरीराचा कुठलाच भाग कामात येत नसला तरी एखादा आजारी व्यक्तीस जीवदान ठरू शकते. या सामाजिक भावनेतून आशुतोष व निकिता यांनी विवाहाच्या दिवशीच अवयवदानाचा संकल्प करीत आदर्श निर्माण केला. यावेळी लग्न मंडपात उपस्थित असणाऱ्या वर्हाडी लोकांना या आयोजनामागची भुमिका पुनर्जिवन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ राजेश उभाड यांनी मांडली याप्रसंगी जितेंद्र रोडे,अँड प्रशांत गाठे,विश्राम कुलकर्णी,डॉ हर्षराज दफडे आदी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमा प्रसंगी मधुसूदन भेले, बाळाभाऊ कूरळकर,गजानन होले, गंगाधन वाघ देवीदासराव कुबडे आदी नागरिक उपस्थित होते.