अकोला (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपूर्वी चक्री वादळाने थयमान घातले होते या चक्री वादळाचा सर्वात मोठा फटका कोकण विभागाला बसला होता त्यामुळे अनेक गावे अंधारमय झाली आहेत ती प्रकाशमान करण्यासाठी अकोला विभागातुन दोन अधिकारी व सत्तावीस कर्मचारी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव सबडिव्हिजन येथे आज रवाना झाले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी निसर्ग चक्री वादळाने हाहाकार माजविला होता याचा फटका रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला असून अद्यापही शेकडो गावे अंधारमय आहेत त्याला प्रकाशमान करण्यासाठी अकोला जिल्ह्यातून २७ जनाची एक टीम रायगड जिल्ह्यात पाठवल्या गेली असून रायगड जिल्ह्यातील गोरेगाव सब डिव्हिजन या भागातील गावे प्रकाशमान करण्याचे काम हे टीम करणार आहे.यामध्ये सहाय्यक अभियंता मिर्झा सहाय्यक अभियंता खान यांच्या सह २५ कर्मचारी आज दुपारी रवाना झाले अशी माहिती महाविरतरण कार्यालयाकडून मिळाली आहे .