बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळ मधिल बोर्डी, रामापूर, शिवपुर येथिल संत्रा उत्पादक शेतकर्याचे काल झालेल्या अवकाळी पावसामूळे संत्रा बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शेतकरी हवालदील झाला आहे हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामूळे जातो की काय असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. आधिच सर्व दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकर्याच्या हातातील कापुस, सोयाबिन, उडीद, मुंग, ज्वारी, आ धी पीके पुर्णपणे उध्वस्त झाली आहे. अशातच आता राहिलेले संत्राचे पिक सुध्धा या अवकाळी पाण्यामूळे धोक्यात आले आहे. तरी वरिस्ठ अधिकारी यांनी दखल घेवुन बोर्डी, शिवपुर, रामापूर येथिल संत्रा पिकांचे मंडळ अधिकारी, व तलाठी यांना सर्वे करण्याचे आदेश द्यावे. व लवकरात लवकर संत्रा उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी शेतकर्या कडून होत आहे.