• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

फडणवीस, पवार यांना पदभार स्वीकारण्याची घाई का झाली? जाणून घ्या Inside Story

adil by adil
May 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 2
0
देवेंद्र फडणवीस
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई, 25 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता संघर्षात सोमवारी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना दुसऱ्या बाजूला मुंबईत राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेतल्यानंतर 48 तासांनी सोमवारी अचानक मंत्रालयात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांनी आपआपल्या पदाचा कार्यभार देखील स्वीकारला. भापजने सरकार स्थापनेचा संदर्भात केलेल्या वेगवान हलचाली पाहून गेल्या 15 दिवसांपासून सरकार स्थापनेची चर्चा करणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सक्रीय झाले आहेत. या तिन्ही पक्षांनी एकत्रपणे राजभवनात राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. आता प्रश्न हा उपस्थित केला जात आहे की, राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सर्व राजकीय पक्ष इतके सक्रीय का झाले होते. यापैकी एकाही पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाची वाट का नाही पाहिली याचे उत्तर सत्ता संघर्षात दडले आहे.

राज्यात सकाळापासून सुरु झालेल्या वेगवान घडामोडी मागे एकच अर्थ दडला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी प्रत्येकाला आपली बाजू अधिक सक्षम करायची आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पक्षभार स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाला हे दाखवून द्यायचे आहे की, त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. जरी न्यायालयाने परिस्थिती जशी आहे तशी ठेवण्याचे आदेश दिले तरी फडणवीस आणि पवार त्यांचे काम करु शकतील.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी न्यायालयाच्या निर्णयाआधीच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे. यामागे देखील विरोधकांचा हेतू स्वत:ची बाजू मजबूत करणे हाच होता. विरोधकांनी हा दावा केलाच नसता तर फडणवीस यांची नियुक्ती रद्द करून सत्ता स्थापनेची मागणी रद्द ठरली असती.

आता पुढे काय होणार?

सोमवारी कोर्टाने सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेतली. न्यायालयाने 24 तासांसाठी त्यांचा निर्णय राखून ठेवला आहे. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. न्यायालय विधानसभेचे अधिवेशन कधी बोलवाचे यासंदर्भात निर्णय देऊ शकतो. जर न्यायालयाने याबाबत निर्णय दिला नाही तर परंपरेनुसार गुरुवारी (28 नोव्हेंबर) किंवा शुक्रवारी (29 नोव्हेंबर ) रोजी विधानसभेचे सत्र बोलवावे लागू शकते. कारण राज्यपालांनी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत दिली आहे. विधानसभेचे एक सत्र नव्या सदस्यांना शपथ देण्यासाठी आणि अध्यक्षांच्या निवडीसाठी जाईल. त्यानंतर सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागेल.

Tags: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Post

अडगाव बु येथे कबड्डी चे सामने उत्साहात संपन्न..

Next Post

शिवसेना अकोट ता.वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी निवेदन.

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आकोट

शिवसेना अकोट ता.वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी निवेदन.

बोर्डी

बोर्ड़ी ग्राम पंचायत गौणखनिज 22 लाख रुपये दंड प्रकरणी अखेर तहसीलदार यांनी घेतली दखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.