अकोला (प्रतिनिधी)– कॉमेड गोविंद पानसरे प्ररित नववे कॉमेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ९ व १० मार्च रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, अमरावती येथे आयोजन केले. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिध्द विचारवंत व साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर राहणार असून या संमेलनाचे उद्घाटन ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे असून प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कॉ. भालचंद्र कानगो, आमदार तथा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रसिध्द साहित्यिक उत्तम कांबळे आदी मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे. दुपारी २.३० वाजता ‘आंबेडकर व माक्रस नवे आकलन नव्या दिशा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.बी.टी.देशमुख व प्रमुख वक्ते म्हणून उध्दव कांबळे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील श्रमिकांचा संघर्ष’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रम अध्यक्षस्थानी डॉ.महेबुब सय्यद राहणार असून डॉ. अशोक पळवेकर, डॉ.प्रा.राकेश वानखेडे, डॉ.समाधान इंगळे यांचा प्रमुख सहभाग राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता ‘राष्ट्रवादाचे वर्तमान’ या विषयावर परिसंवाद कॉ.डॉ.भालचंद्र कानगो यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून चंद्रकांत वानखडे, भारत पाटणकर यांचा सहभाग राहणार आहे. रात्री ८ वाजता ‘शाहिरी जलसा’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १० मार्च रोजी सकाळी १० वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सुखदेव ढाणके राहणार असून सुत्र संचालन प्रा.संजय घरडे करणार आहेत. यामध्ये सुनिता झाडे, विरा राठोड, सुदाम सोनुले, सुनिल यावलीकर, प्रसेनजित गायकवाड, डॉ.गणेश टाले, प्रमोद अहिरे, प्रफुल्ल भुजाडे, मारोती मानेमोड, विलास थोरात, माया वासनिक गेडाम आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.
सकाळी ११.३० वाजता ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भारतातील भवितव्य’ या विषयावर व्याख्यान आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले असून प्रा.जयदेव डोळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. दुपारी १ वाजता ‘अण्णाभाऊंच्या लढाऊ नायिका आणि त्यांचा संघर्ष या विषयावर पारसवाद आयोजित केला असून कॉ. प्रा.तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.डॉ.बी.टी.अौरे, डॉ.नंदा तायवाडे, कॉ.स्मिता पानसरे यांचा प्रमुख सहभाग राहणार आहे. दुपारी ३ वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर असून कॉ.डॉ.भालचंद्र कानगो, कॉ.तुकारात भस्मे, उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे या संमेलनात रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध कार्यकर्माचा आस्वाद घ्यावा असे संयोजक प्रा.प्रसेनजित तेलंग, कोषाध्यक्ष प्रा.विजय राग व समन्वयक सागर दुर्योधन अकोल्याचे कॉ. रमेश गायकवाड़, कॉ. एस. एन. सोनोने, कॉ. सुनीता पाटिल, समन्वयक कॉ. नयन गायकवाड यांच्यासह संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
अधिक वाचा : पातूर येथे पहिले बाल साहित्य संमेलन थाटात विद्यार्थ्यांनि साकारली विविध दालने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola