तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा परिसरातील शेतकऱ्यांना वान धरणाचे पाणी कालव्या द्वारे मिळण्याबाबत शेतकरी बांधव आज ५ डिसेंबर ला वन प्रकल्पाच्या कार्यालयांमध्ये गेले असता संबंधित अधिकारी कार्यलयामध्ये उपस्तिथ नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तेल्हारा येथील वान प्रकल्प कार्यालयाच्या गेटला हार घालून आपला संताप व्यक्त केला.
तेल्हारा येथील सात्काबाद ,तूदगाव ,जाफ्रापूर ,गाडेगाव , आदी भागातील शेतकरी वान विभागीय कार्यालयामध्ये वाण धरणाचे पाणी कालवा द्वारे मिळावे या करीता सतत मागणी करत असून देखील ,या कार्यालया द्वारे उडवा उडवी चे उत्तर मिळत असल्याने या भागातील सर्व शेतकऱ्यांनी धरणाचे पाणी येईल या आशेवर हरभरा ,गहू , इत्यादी रब्बी पिके पेरले असून पाण्या अभावी या पिकांचे नुकसान होत आहे , त्या मुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे .शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सर्व प्रथम तहसील कार्यालय गाठून तहसील दारांना धरणाचे पाणी या भागातील शेतकऱ्यांसाठी सोडण्यात यावे याकरिता निवेदन दिले . व त्यानंतर शेतकरी बांधव वान व्यवस्थापन कार्यालय तेल्हारा येथे गेले असता तेथील संबंधित अधिकारी उपस्थित नसल्यामुळे शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या गेटला हार घालून निषेध व्यक्त केला . एक महिन्या पासून सतत मागनी करून सुद्धा वान प्रकल्प कार्यालयातील अधिकारी दखल घेत नसल्यामुळे शेवटी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . या वेळी रामभाऊ फाटकर , मदन गुजर ,ओमभाऊ चितलांगे ,सचिन थाटे ,भैया देशमुख ,निलेश धनभर ,रवींद्र ताथोड,चंद्रकांत मोरे, विककी मल्ल,गणेश विखे,उदय देशमुख, राजेंद्र देशमुख, गणेश कुटे, विष्णुदास नागोलकार, दयाराम नागोलकार, शंकरराव भारसाकळे, श्रीकृष्ण नागोलकार, विठ्ठल भारसाकळे, विजय गावंडे, रामकृष्ण नागोलकार, रामेश्वर वारूळकर, इत्यादी शेतकरी उपस्तिथ होते.
शेतकऱयांच्या समस्या प्रति अधिकारी व पदाधिकारी सह लोकप्रतिनिधिंची संवेदना संपुष्ठात आल्यामुळे बळीराज्याचा वाली
कोणी नसल्याचं भयावह चित्र निर्माण झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनाच आपल्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे . भैया देशमुख, युवा शेतकरी तेल्हारा