अकोला (शब्बीर खान): अकोला शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. या गर्तेतून त्यांना बाहेर काढण्याऐवजी येथील वर्तमान व्यवस्था तोडा फोडा आणि राज्य करा या ब्रिटीश नितीचा वापर करुन राजकारण करीत असल्याचे टिकास्त्र भाजपावर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या भाषणातून सोडले. आमचा लढा आता शेतकर्यांच्या मागण्यासाठी असेल असेही त्यांनी यावेळी सूचित करून नरेंद्र मोदी हे सेल्समन असून, कर वाढवून त्यांनी सर्वांनाच वेठीस धरत आहे असा आरोप केला.
शेतकरी जागर मंचाच्यावतीने अकोल्यात मंगळवार, २३ ऑक्टोबर रोजी दुसर्या ‘कासोधा’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना सिन्हा बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला शेतकरी टिना देशमुख होत्या. व्यासपिठावर खासदार शत्रुघ्न सिन्हा, आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते घनश्याम तिवारी, गुजराजचे माजीमंत्री प्रविणभाई जडेजा, आपच्या प्रिति मेनन, स्वराज्य सेनेच अब्दूल फारुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘खामोश’ या त्यांच्या विख्यात डॉयलागने भाषणाला सुरुवात करताना देशातील ५१ टक्के शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी आपण तत्पर असल्याचे अधोरेखित केले. मी या प्रातांत नवखा असलो तरी आपल्या सर्वांचे पूर्वज शेतकरीच होते. म्हणूनच मी येथे आलो आहे. या देशातील शेती समृध्द होती. पण अलीकडे शेती लयास गेली आहे. त्याला कारणीभूत येथील व्यवस्था आहे. चांगली कसदार, उपजावू जमिन या व्यवस्थेने कवडीमोल दरात धनधागंड्याच्या घशात घातली आहे. जमिनीचा पोत बिघडल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.
खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारचे वाभाडे काढले. बेरोजगारी, शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे सरकार जर भजे तळायला लावत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकर्यांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणार्या राज्य शासनाने शेतकर्यांचा विश्वासघात केला असून, यावरुनच हे सरकार ठगांचे असल्याचे प्रतिबिंत होत असल्याचे शरसंधान साधताना माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचा इशारा मंगळवारी अकोला येथे दिला.
सिन्हा पुढे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात थापाडे, ठगाशी गाठ पडेल असे वाटले नव्हते, ज्या मागण्या सहज मान्य करण्यासारख्या असताना त्या मागण्यांची पूर्तता लेखी आश्वासन देऊन करता येत नसेल तर हे सरकार शेतकर्यांच्या हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे. आमचा संघर्ष हा तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. अकोल्यात उभी ठाकलेली ही ताकद आता अकोल्यापर्यंत मर्यादित नसून संपूर्ण देशात शेतकरी लढा उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी येथे केली. या लढ्यात आपण एकटे नाहीत तर संपूर्ण देश उभा असल्याचे व्यासपिठावरील देशातील नेत्यांच्या उपस्थितीने हे दर्शविले असल्याचा विश्वास त्यांनी शेतकर्यांना दिला.
अधिक वाचा : अकोला-म्हैसांग रस्त्याची बिकट अवस्था झुंज संघटने कडून निवेदन सादर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola