• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

न्यायव्‍यवस्‍थेच्‍या स्वातंत्र्याचा अर्थ नेहमीच सरकारविरोधात निर्णय देणे असा होत नाही

Our Media by Our Media
November 5, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
सुप्रिम
12
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

सोशल मीडियाच्या आगमनानंतर आपला समाज बदलला आहे. एखाद्‍या विशिष्‍ट खटल्‍यात अनुकूल निर्णय घेण्यासाठी न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक दबाव गट तयार झाले आहेत. हे गट असे वातावरण तयार करतात की, एखाद्‍या खटल्‍याचा निर्णय त्‍यांच्‍या बाजूने आता तरच न्‍यायव्‍यवस्‍था स्‍वतंत्रपणे काम करत आहे, असे मानले जाईल पण निर्णयच त्‍यांच्‍याविरोधात असेल तर ते न्‍यायव्‍यस्‍थेच्‍या स्वातंत्र्यावर हा दबावगट भाष्‍य करतो. न्यायव्‍यवस्‍थेच्‍या स्वातंत्र्याचा अर्थ नेहमीच सरकारविरोधात निर्णय देणे, असा होत नाही, असे मत सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्‍यक्‍त केले. एका माध्‍यम समूहाच्‍या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्‍यान, धनंजय चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. याच दिवसी न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे नवे सरन्यायाधीश म्‍हणून पदभार स्‍वीकारतील.

सरकारी हस्तक्षेपापासून स्वातंत्र्य ही एकमेव गोष्‍ट नाही

न्यायव्यवस्थेची निष्पक्षता आणि पारदर्शकता स्पष्ट करताना सरन्‍यायाधीश चंद्रचूड म्‍हणाले की, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा अर्थ नेहमीच सरकारच्या विरोधात निर्णय देणे असा होत नाही. काही दबाव गट माध्‍यमांचा वापर करुन न्यायालयांवर दबाव आणतात. त्यांना हवा असणारा अनुकूल निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. न्यायिक स्वातंत्र्याची व्याख्या कार्यकारिणीपासूनचे स्वातंत्र्य अशी केली जाते. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य म्हणजे सरकारी हस्तक्षेपापासून स्वातंत्र्य पण न्यायिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने ही एकमेव गोष्ट नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जर निर्णय त्यांना आवडत नसेल तर

सोशल मीडियाच्या आगमनानंतर आपला समाज बदलला आहे. अनुकूल निर्णय घेण्यासाठी न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणारे दबावगट आपल्याला दिसतात. हे दबावगट असे वातावरण निर्माण करतात की निर्णय त्यांच्या बाजूने आला, न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे काम करत आहे, असे मानले जाईल. जर निर्णय त्यांना आवडत नसेल तर न्यायव्यवस्था स्वतंत्र मानली जाणार नाही.

न्यायाधीश फक्त कायदा आणि संविधानानेच मार्गदर्शन करतात

न्यायमूर्तीची सदसद्विवेकबुद्धी कायदा आणि संविधानाने चालते, यात शंका नाही. जेव्हा सरकारच्या विरोधात निकाल येतो आणि इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली जाते तेव्हा न्यायव्यवस्था खूप स्वतंत्र असते, पण जर सरकारच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्था आता स्वतंत्र राहिली नाही, अशी चर्चा झाली असती. म्‍हणूनच सरकारविरोधात निर्णय देणे याचा अर्थ न्यायव्‍यवस्‍थेचे स्वातंत्र्य अशी व्‍याख्‍या मी करत नाही’, असेही सरन्‍यायाधीश म्‍हणाले.

पंतप्रधान माझ्या निवासस्थानी येण्यात काहीही गैर नाही

गणेशोत्‍सव काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या निवासस्‍थानी जावून गणेश दर्शन घेतले होते. यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. यावर बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, राजकारण्यांमध्ये परिपक्वता असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या निवासस्थानी गणपती पूजेसाठी आले होते. यात काही गैर नाही, असे मला वाटते. कारण न्यायव्यवस्था आणि कार्यपालिका यांच्यात अगदी सामाजिक पातळीवरही सतत बैठका सुरू असतात. राष्ट्रपती भवन, प्रजासत्ताक दिन इत्यादी कार्यक्रमांवर आपण भेटतो. आम्ही पंतप्रधान आणि मंत्र्यांशी चर्चा करतो. या संभाषणात आपण ज्या मुद्द्यांवर निर्णय घेतो अशा बाबींचा समावेश नाही, तर वैयक्तिक जीवन आणि सर्वसाधारणपणे समाजाशी संबंधित समस्यांचाही समावेश असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

कार्यपालिकेला न्यायालयीन बाबींमध्ये हस्तक्षेपाचा अधिकार नाही

आपण करत असलेल्या कामाचे मूल्यमापन आपल्या लिखित शब्दांवरून होत असते. आम्ही (न्‍यायाधीश) जो काही निर्णय देतो तो गुप्त ठेवला जात नाही. तो छाननीसाठी खुला असतो. प्रशासकीय पातळीवर कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील चर्चेचा न्यायालयीन पातळीवर काहीही संबंध नाही. लोकशाहीत अधिकारांचे विकेंद्रीकरण म्हणजे न्यायपालिका धोरणे बनवू शकत नाही कारण तो कार्यपालिकेचा विशेषाधिकार आहे. सरकारला धोरणे बनवण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे कार्यपालिकेला न्यायालयीन बाबींमध्ये हस्तक्षेप करण्‍याचा अधिकार नाही. जोपर्यंत हा भेद आपल्या मनात स्पष्ट आहे तोपर्यंत कार्यकारिणी आणि न्यायपालिकेच्या बैठकीत आणि बोलण्यात काहीही गैर नाही, असेही सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

Previous Post

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम

Next Post

सरकारी नोकर भरतीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, “निवड प्रक्रिया सुरु असताना…”

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Supreme-Court

सरकारी नोकर भरतीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, "निवड प्रक्रिया सुरु असताना..."

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

ज्येष्ठांसाठी 'आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना', जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.