• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, December 16, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोदी सरकारचा १० वर्षांचा लेखाजोखा.! राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील १० प्रमुख मुद्दे

Our Media by Our Media
January 31, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
98 1
0
Draupadi Murmu
14
SHARES
709
VIEWS
FBWhatsappTelegram

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेच्या अखेरच्या अधिवेशनाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यानिमित्ताने राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनात पहिल्यांदाच प्रवेश केला. येत्या काही महिन्यांतच देश लोकसभा निवडणुकीला सामोरे जाईल. त्या दृष्टीने राष्ट्रपती मुर्मू यांनी अभिभाषणात मोदी सरकारच्या लोकाभिमुख धोरणांचा गौरव करताना विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या ४ मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारचा विश्वास असल्याचे सांगितले.

राम मंदिर उभारणीचे स्वप्न सत्यात उतरले

राम मंदिर उभारणी हे शतकानुशतकांचे स्वप्न होते, ते आता सत्यात उतरले आहे’, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले.

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

विकसित भारताची भव्य इमारत ४ स्तंभांवर

माझ्या सरकारचा विश्वास आहे की विकसित भारताची भव्य इमारत ४ मजबूत स्तंभांवर उभी राहील. युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब, असे हे स्तंभ आहेत. देशाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक समाजात या सर्वांची परिस्थिती आणि स्वप्ने सारखीच आहेत. त्यामुळे या चार स्तंभांना बळकट करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. सरकारने कराचा मोठा हिस्सा हे खांब मजबूत करण्यासाठी खर्च केला आहे. ४ कोटी १० लाख गरीब कुटुंबांना त्यांची कायमस्वरूपी घरे मिळाली. यावर सुमारे ६ लाख कोटी रुपये खर्च झाले. पहिल्यांदाच सुमारे ११ कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत नळाने पाणी पोहोचले असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

२५ कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर

जगात गंभीर संकट असतानाही भारत सर्वात वेगवान विकसीत होणारी अर्थव्यवस्था बनली. भारत चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर झेंडा फडकावणारा पहिला देश बनला. निती आयोगाच्या माहितीनुसार, मोदी सरकारने एक दशकाच्या कार्यकाळात सुमारे २५ कोटी देशवासीयांना गरिबीतून बाहेर काढले. ही प्रत्येक गरीबासाठी एक नवा विश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेतील अभिभाषणात मोदी सरकारच्या धोरणांबद्दल कौतुकोद्गार काढले.

सलग दुसऱ्या तिमाहीत विकास दर ७.५ टक्के

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, गेले वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ टक्के राहिल्याचा उल्लेख करत त्यांनी देशाची आर्थिक धोरणे उत्कृष्ट असल्याचे वर्णन केले. डिजिटल इंडियासारख्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

मानवकेंद्रित विकासावर भर

सरकार मानवकेंद्रित विकासावर भर देत आहे. आमच्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सन्मान सर्वोपरि आहे. ही आपली सामाजिक न्यायाची संकल्पना आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलमात हा संदेश आहे. सरकारने पहिल्यांदाच मागासलेल्या जमातींचीही काळजी घेतली आहे. त्यांच्यासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपयांची पंतप्रधान जनमन योजना राबवली आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

लोककल्याणकारी योजनांचा सकारात्मक परिणाम

सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजना केवळ सुविधा नाहीत तर देशातील नागरिकांच्या संपूर्ण जीवनचक्रावर याचा सकारात्मक परिणाम होत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर चालणारे सरकार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय्य संधी उपलब्ध करून देण्यात व्यस्त आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ओबीसींच्या केंद्रीय कोट्यातील प्रवेशामध्ये २७ टक्के आरक्षण सुनिश्चित करण्यात आले. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्ज १० वर्षांत ३ पट वाढले

सरकार आज शेतीला अधिक फायदेशीर करण्यावर भर देत आहे. पीएम किसान सन्मान निधि अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना २ लाख ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांसाठी बँकांकडून सुलभ कर्ज १० वर्षांत ३ पट वाढले आहे.

महिला शक्तीचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रयत्न

महिला शक्तीचे सामर्थ्य वाढविण्यासाठी सरकार प्रत्येक स्तरावर काम करत आहे. महिलांचा आर्थिक सहभाग वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आज सुमारे १० कोटी महिला स्वयं-सहायता गटांमध्ये सामील झाल्या आहेत. सरकार २ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची मोहीम राबवत आहे. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत गटांना १५ हजार ड्रोन दिले जात आहेत.

सरकारचा झिरो इफेक्ट झिरो डिफेक्टवर भर

आज जगात पर्यावरणपूरक उत्पादनांना विशेष मागणी आहे. म्हणूनच सरकार झिरो इफेक्ट झिरो डिफेक्टवर भर देत आहे. आज आपण हरित ऊर्जेवर खूप लक्ष केंद्रित केले आहे. १० वर्षांमध्ये, जीवाश्म नसलेल्या इंधनावर आधारित ऊर्जा क्षमता ८१ GW वरून १८८ GW पर्यंत वाढली आहे.

परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल कायदा करण्याची तयारी

द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, सरकारला परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल तरुणांच्या चिंतेची जाणीव आहे. ते थांबवण्यासाठी कायदा करणार आहे. मुर्मू यांनी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे, फौजदारी कायद्यांच्या जागी नवीन कायदे करणे, तीन तलाक कायदा, यासह केंद्र सरकारच्या इतर अनेक कामांचा उल्लेख केला.

Previous Post

अकोला जिल्ह्यातील २५ हजार घरांवर होणार ‘ सूर्योदय ‘ योजनेतून ऊर्जानिर्मिती

Next Post

अंतरिम बजेटमध्ये २०४७ च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची गॅरंटी : पीएम मोदी

RelatedPosts

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Next Post
पंतप्रधान

अंतरिम बजेटमध्ये २०४७ च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची गॅरंटी : पीएम मोदी

अकोला

जिल्हा कोषागारात ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.