• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 21, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

“शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय”

Our Media by Our Media
June 17, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
192 2
0
शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
28
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: खरीप हंगाम २०२० प्रकरणी दाखल एका याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने एका विमा कंपनीला दणका देत शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी रुपये जमा करण्यात आदेश दिले आहेत. मात्र, या सुनावणीत राज्य सरकारचा काही सहभाग नव्हता, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने तातडीने बैठक बोलवण्याची मागणी करत ठाकरे सरकार यामध्ये वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे.

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने एक बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ग्राह्य धरत ६ आठवड्यात विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश बजाज अलायन्स कंपनीला दिले होते. या निर्णयाच्या विरोधात सदर विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली. यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश पारित केले आहेत. सुनावणी दरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे की, ठाकरे सरकारने या संवेदनशील विषयाबाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलेच नव्हते. त्यामुळे सुनावणी प्रक्रियेत राज्य सरकारचा काहीही सहभाग नव्हता, असे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी सातत्याने आपले प्रयत्न सुरु आहेत. मात्र, राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. विमा कंपनीला शेतकऱ्यांना रक्कम देण्याकरीता भाग पाडण्याऐवजी ठाकरे सरकारने न्यायालयाच्या निर्णयात बदल करावा यासाठी दिवाणी अर्ज दाखल केला आहे. विमा कंपनी अथवा राज्य सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. परंतू न्यायालयीन खोडा घालत हा विषय शक्य तेवढा प्रलंबित ठेवण्याचा राज्य सरकारकडून होत असलेला प्रयत्न लाजिरवाणा असल्याची टीका राणा जगजितसिंह पाटील यांनी केली.

शेतकरी विरोधी सरकार, हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किमान आतातरी हा विषय गांभीर्याने घेऊन बैठक बोलवावी. बैठक न घेतल्यास ठाकरे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल. तसेच नुकसान भरपाई मिळण्यास आणखीन विलंब होईल. त्यामुळे विलंबास कारणीभूत राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने व्याजाची मागणी करावी लागेल, असेही पाटील म्हणाले.

Tags: accountscourtfarmersGovernmentUddhav Thackeray
Previous Post

विरोधानंतर सरकारने घेतला मोठा निर्णय; अग्निपथ योजनेसाठीची वयोमर्यादा वाढवली

Next Post

मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती : तालुकास्तरावर शिबीर

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
मोटार वाहन तपासणी

मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती : तालुकास्तरावर शिबीर

मानसिक त्रास देत दादागिरी करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना बसणार चाप, आरबीआय उचलणार कठोर पावले

मानसिक त्रास देत दादागिरी करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना बसणार चाप, आरबीआय उचलणार कठोर पावले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.