• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, December 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मार्चपासून राज्य निर्बंधमुक्‍त, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

Our Media by Our Media
February 22, 2022
in Featured, कोविड १९, ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
105 1
0
Rajesh tope
33
SHARES
755
VIEWS
FBWhatsappTelegram

जालना : येत्या मार्च महिन्यात महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना कोरोना निर्बंधांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील महिन्यापासून राज्य निर्बंधमुक्‍त करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिले. मास्कमुक्‍तीचा कोणताही विचार नसून, लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या असलेल्या निर्बंधांत शिथिलता असावी, असे केंद्र सरकार आणि टास्क फोर्सने सुचविले आहे. त्यानुसार येत्या मार्च महिन्यापासून निर्बंधांत शिथिलता आणली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

निर्बंध कमी करण्याचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील. मार्चपासून निर्बंध कमी होण्यास हरकत नाही, असे टोपे म्हणाले. कोरोना स्थितीबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठविले असून, लसीकरणाकडे अधिक लक्ष देण्यास सुचविले आहे.

तसेच निर्बंधांत शिथिलता आणून मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर याकडे लक्ष देण्यासाठी जागरूकता आणण्यास सांगण्यात आले आहे. या सूचनांकडे आरोग्य खाते लक्ष देत असून, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या मदतीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती टोपे यांनी दिली. राज्यात लसीकरण समाधानकारकरीत्या झाले आहे. आता राज्यात फार दिवस निर्बंध राहणार नसून, सध्या काही प्रमाणात निर्बंध असलेले हटवण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गृह विभागाचा अहवाल आल्यानंतर लवकरच आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात येतील, असे ते म्हणाले.

चौथी लाट येणार नाही

राज्यातील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे, त्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. समाजाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर लसीकरण करून घेणे खूप गरजेचे आहे. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका उद्भवणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हे निर्बंध उठवणार

* ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय ः 50 टक्के उपस्थितीची अट.
* लग्नसमारंभासाठी 200 व्यक्तींनाच परवानगी.
* स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार समुद्रकिनारे, उद्याने, पार्क सुरु आहेत.
* उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने.
* भजन आणि इतर स्थानिक सांस्कृतिक आणि लोककला- मनोरंजन कार्यक्रम हे दालन किंवा मंडपाच्या 50% क्षमतेने.
* रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी.
* आठवडी बाजार, पर्यटन स्थळे बंद.
* घोड्यांची शर्यत व इतर खेळांसाठी 25 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती.
* राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी

Tags: CovidHealth Minister Rajesh Topemahrashtra
Previous Post

शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन; पोस्टरचे विमोचन

Next Post

एसटी संपाबाबत आता शुक्रवारी उच्‍च न्‍यायालयात सुनावणी

RelatedPosts

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Next Post
delhi high court

एसटी संपाबाबत आता शुक्रवारी उच्‍च न्‍यायालयात सुनावणी

अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.