• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शाळा बंद, पण वसतिगृहे सुरुच ‘जेवढे वास्तव्य तेवढीच फी’ आकारण्याची गरज

Our Media by Our Media
January 19, 2022
in Featured, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
92 1
0
School-Fees-
13
SHARES
666
VIEWS
FBWhatsappTelegram

सातारा : सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये बंद झाली आहेत. मात्र महाविद्यालयांची वसतिगृहे मात्र सुरुच आहेत. बर्‍याच प्रवेशितांनी संसर्गाच्या धास्तीने वसतीगृहांकडे पाठ फिरवली असली तरी वसतीगृहांची फी मात्र सुरुच आहे. कोरोना काळात जेवढे वास्तव्य तेवढ्याच दिवसांची वसतीगृह फी आकारली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून होत आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये शाळा-महाविद्यालये टप्प्या-टप्प्याने सुरु झाली. कोचींग क्लास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरु झाली होती. ग्रामीण भागातून शहरामध्ये शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे महाविद्यालय व परिसरातील वसतिगृहांमध्ये राहणे पसंत करतात. येण्या-जाण्याचा त्रास कमी व्हावा, प्रवासाचा वेळ व खर्च वाचवण्यासाठी वसतिगृहाची निवड केली जाते. काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करणे परवडणारे नसते असे विद्यार्थीच वसतिगृहांमध्ये प्रवेश घेतात. काही वसतीगृहांमध्ये दोन टप्प्यात तर काही वसतीगृहांमध्ये एकरकमी फी भरुन मगच प्रवेश दिला जातो. हीच पध्दत जिल्ह्यासह मोठ्या शहरांमधील महाविद्यालये व वसतिगृहांमध्ये सर्रास वापरली जात आहे. परंतू सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. त्यामुळे वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी घरी गेले आहेत. सध्या वसतिगृहांमध्ये स्पर्धापरीक्षा अथवा तत्सम क्लास करणारे विद्यार्थीच राहत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

ऑक्टोबरमध्ये शाळा महाविद्यालये सुरु झाल्यामुळे बहुतांश वसतिगृह पूर्ण क्षमतेने प्रवेश झाले होते. मात्र आता सर्व महाविद्यालये बंद झाल्याने केवळ तीन महिन्यांसाठी त्यांना एक वर्षांची वसतीगृहाची फी भरावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. ग्रामीण भागातून येणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी व सामान्य कुटुंबातील आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे जेवढे दिवस वसतिगृहात वास्तव्य आहे, तेवढ्याच दिवसांचे शुल्क आकारले जावे, एकदम सहामाही किंवा वार्षिक फी आकारु नये, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून जोर धरु लागली आहे.

संसर्गाची टांगती तलवार…

महाविद्यालये बंद असली तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी अभ्यासासाठी वसतिगृहातच राहतात. मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरचा वापर केला जात असला तरी बहुतांश वसतिगृहांमध्ये 20 ते 25 सदस्यांमागे एक स्वच्छतागृह व स्नानगृह अशी संकल्पना असते. तसेच ती दिवसातून एकदाच स्वच्छ केली जातात. तसेच एकाच मेसमध्ये जेवण केले जाते. त्यामुळे संसर्गाचा धोका संभवतो. यामुळे वसतिगृहात राहूनही संसर्गाची टांगती तलवार सदैव कायम राहत आहे.

Tags: CovidhostelsSchool
Previous Post

South Africa vs India 1st ODI : राहुलच्या कर्णधारपदाची आज ‘परीक्षा’

Next Post

‘सुकन्या समृद्ध योजना’; डाक विभागाव्दारे विशेष मोहिम

RelatedPosts

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
‘सुकन्या समृद्ध योजना’; डाक विभागाव्दारे विशेष मोहिम

‘सुकन्या समृद्ध योजना’; डाक विभागाव्दारे विशेष मोहिम

corona covid 19

कोरोना अपडेट : देशातील दैंनदिन रुग्णसंख्या ३ लाख पार, २४ तासांत ४९१ जणांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.