• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, November 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Delhi air pollution : वायू प्रदूषणप्रश्‍नी दिल्ली सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

Our Media by Our Media
November 15, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
80 2
0
Supreme Court: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर जायला नको
13
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) संपूर्ण लॉकडाऊन लावून वायू प्रदूषणामुळे ( Delhi air pollution ) निर्माण झालेल्या स्थितीवर नियंत्रण मिळवले जावू शकते, असे प्रतिज्ञापत्र दिल्ली सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यास तयार आहे. पंरतु, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह शेजारील राज्यात देखील लॉकडाउन लावण्यात आल्यानंतरच अशाप्रकारचे निर्णय प्रभावी ठरू शकतात,असे दिल्ली सरकारने न्यायालयात स्पष्ट केले.

Delhi air pollution : प्रदूषण कमी करण्यासाठीच्‍या उपाययोजनांची माहिती सादर

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

दिल्लीतील प्रदूषणाच्या स्थितीसंबंधी आदित्य दुबे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश एन.व्ही.रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती डी.व्हाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमक्ष सुनावणी सुरू आहे. राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती राज्य सरकारने सुनावणी दरम्यान खंडपीठासमक्ष सादर केली.

दाेन दिवसांसाठी वाहने रस्त्यावर चालवण्यास पूर्णत: बंदी का घातली जावू नये? : खंडपीठ

शेजारच्या राज्यातील शेतकर्यांकडून पीक काढणीनंतर शेतात शिल्लक असलेले तण जाळण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे, असे सांगत पुन्हा एकदा राज्य सरकारने प्रदूषणासाठी शेजारच्या राज्यांना जबाबदार ठरवले. पंरतु, केवळ १०% प्रदूषण तण जाळल्याने होते. प्रदूषणाची इतर कारणे देखील आहेत, असा युक्तिवाद केंद्र सरकारची बाजू मांडणार्‍या सॉलिसिटर जनरल कडून करण्यात आला. वाहनांमधून निघाणारा धूर प्रदूषणासाठी कारणीभूत असेल,तर दोन दिवसांसाठी वाहने रस्त्यावर चालवण्यास पूर्णत: बंदी का घातली जावू नये? असा प्रतिप्रश्न खंडपीठाने विचारला.

कृती आराखड्याची माहिती द्‍या

परिस्थिती अंत्यत खराब झाली असताना देखील आपत्कालीन बैठका बोलावल्या जात आहे, असे म्हणत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. उद्या, संध्याकाळी चार वाजतापर्यंत स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आखण्यात आलेल्या कृती आराखड्याची माहिती देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. कुठल्या उद्योगांना बंद केले जावू शकते? आणि कुठल्या वाहनांना रस्त्यावर चालवण्यापासून थांबवले जावू शकते, याची माहिती मंगळवार पर्यंत देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. सोबतच ऊर्जेच्या पर्यायासंबंधी देखील दोघांकडून उत्तर मागवून घेण्यात आले आहे.गेल्या सुनावणीत न्यायालयाने दिल्लीतील खराब होत चालली वायु गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती. दिल्ली सरकारच्या अधिकार क्षेत्रातील हा विषय असल्याने उपाययोजना देखील राज्य सरकारलाच करावे लागतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Tags: Delhi air pollutionDelhi Courtgovernment's
Previous Post

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन

Next Post

25 नोव्हेंबरपर्यंत सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Next Post
akola news

25 नोव्हेंबरपर्यंत सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम

बिरसा मुंडा जयंती

बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.