• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 30, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड

शेतकरी आंदोलन होणार तीव्र; आज तीन वाजता महत्त्वाची बैठक

Our Media by Our Media
November 9, 2021
in फिचर्ड, शेती
Reading Time: 1 min read
102 1
0
शेतकरी आंदोलन होणार तीव्र
22
SHARES
738
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज कुंडली बॉर्डरवर महत्त्वाची बैठक बोलविली आहे. शेतकरी आंदोलनाला जवळपास वर्ष पूर्ण होत आले तरीही सरकारने मागण्या मान्य केलेल्या नाहीत. आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. तीन कृषी कायदे रद्द करावेत यासह एमएसपीच्या हमीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे.

आज दुपारी तीन वाजता संयुक्त किसान मोर्चाच्या महत्त्वाच्या नेत्यांसह सर्व शेतकरी कुंडली बॉर्डरवर जमा होणार आहेत. आंदोलनाला वर्ष पूर्ण होत असल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याबाबत चर्चा होऊ शकते, असे काहींचे म्हणणे आहे. मोर्चाचे सदस्य मंजीत राय म्हणाले, सरकारला नमवायचे असेल तर काही महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच एमएसपी गॅरंटीसाठी २६ नोव्हेंबर, २०२० पासून आम्ही दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहोत. २२ जानेवारीपर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा सुरू होती. त्यानंतर २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर मोर्चा काढला. यावेळी हिंसाचार झाला होता. त्यानंतर सरकारने चर्चेची दारे बंद केली. त्यानंतर सरकारने आजपर्यंत कुठल्याही पातळीवर चर्चा केलेली नाही. त्यामुळे शेतकरी रागात आहेत. सरकारला जर नमवायचे असेल तर संघर्ष तीव्र केला पाहिजे. आज होणाऱ्या बैठकीत या सगळ्या विषयांवर चर्चा होणार असून आंदोलन तीव्र होण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंग चढुनी म्हणाले, आता दिल्लीच्या सीमेवर बसण्यापेक्षा दिल्लीत घुसून पंतप्रधान निवासाला घेराव घातला पाहिजे. जर दिल्लीच्या सीमा सरकार उघडू पाहतेय तर आम्हाला ही संधी आहे. आम्ही दिल्लीत घुसू शकतो आणि पंतप्रधान निवासस्थान आणि संसदेला घेराव घालू.

सुप्रीम कोर्टात याचिका

दिल्लीच्या सीमा अडवून ठेवण्यात आल्याने लाखो नागरिकांना त्रास होत असून आता तर सीमांवर हिंसाचार सुरु झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. स्वाती गोयल आणि संजीव नेवार यांच्यावतीने अ‍ॅड. शेखर झा यांनी ही याचिका दाखल केली आहे. पंजाबमधून आलेल्या लखबीर सिंग नावाच्या दलित युवकाची सिंघू बॉर्डरवर दसर्‍याच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकतर सीमांवर बेकायदेशीरपणे आंदोलन सुरु आहे, दुसरीकडे आता त्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्या आहेत, अशा स्थितीत आंदोलकांना सक्‍तीचे हटविण्याचे निर्देश दिले जावेत, असे याचिकेत म्हटले आहे.

Previous Post

पुणे शिंगवे : बेपत्ता कृष्णाचा मृतदेह गोबर गॅस टाकीत सापडला

Next Post

MLC Election : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर, सतेज पाटील रिंगणात

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
शेतकऱ्याला
Featured

शेतकर्‍यांना नववर्षाची भेट..! ‘डीएपी’ खताची पिशवी फक्त 1,350 रुपयांना मिळणार

January 2, 2025
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत?
Featured

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत?

October 11, 2024
लवकरच शेतकरी करतील विजेची शेती! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अपलातून कल्पना
Featured

लवकरच शेतकरी करतील विजेची शेती! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अपलातून कल्पना

September 13, 2024
पंतप्रधान किसान योजन
Featured

जय किसान..! कृषी क्षेत्रासाठी १४ हजार कोटींच्‍या निधीला मंजुरी

September 2, 2024
Next Post
mlc-election

MLC Election : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर, सतेज पाटील रिंगणात

nawab malik

'कुबूल कुबूल कुबूल... आता मुख्यमंत्र्यांनीच मलिकांविरुद्ध FIR दाखल करावा'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.