• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी सहमत; जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ

Our Media by Our Media
October 27, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
148 2
0
bacchu kadu
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२7 : ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास आज अखेर पिक विमा कंपनीने सहमती दिली. या संदर्भात याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी विधीमंडळात तसेच मंत्रीमंडळ बैठकीत प्रथम चर्चा घडविली होती. दिवाळीच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने अधिसुचना काढून हा प्रस्ताव पाठविला होता. राज्यात अकोला जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे नुकसान भरपाई मिळत असून आता राज्यातील अन्य १९ जिल्ह्यातही हीच प्रक्रिया राबविली जात आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यासंदर्भात कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत ३३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मुग, उडीद, तूर व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर जिल्ह्यात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री बच्चू कडू यांनी दौरे करुन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना मध्य हंगामात आलेल्या प्रतिकृल हवामान परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत २५ टक्के आगाऊ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली होती.

याबाबत विधी मंडळ तसेच मंत्रीमंडळ पातळीवर पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वप्रथम मुद्दा मांडून चर्चा झाली होती. जिल्हा प्रशासनाने याबाबत दि.११ ऑगस्ट रोजी अधिसुचना जारी केली होती. मात्र विमा कंपनी त्यास अमान्य करीत होती. वारंवार त्रुट्या दर्शविण्यात येत होत्या. त्याची पूर्तता ही होत होती. अखेर पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार, आज जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांच्या समवेत बैठक झाली.

या बैठकीत विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर ३३ महसूल मंडळातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाईची रक्कम मिळेल. दिवाळीच्या आधी ही रक्कम मिळावी असे निर्देशही विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. खोत यांनी दिली.

दि.११ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने अधिसुचना जारी केली होती. त्यास विमा कंपनीने असहमती दर्शविली होती. आता विमा कंपनीने ही बाब मान्य केल्या नंतर राज्यातील १९ जिल्ह्यातही अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना आगाऊ नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

Tags: bacchu kadufarmersInsurance
Previous Post

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती सभा: जनावरांच्या पाणवठ्यांची स्वच्छता मोहीम राबवून साजरी करा वसुबारस -जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Next Post

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी ११५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त – पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याला यश

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी ११५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त - पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याला यश

Konkan railway

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर!! कोकण रेल्वे मार्गावर धावणार मँगो स्पेशल ट्रेन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.