• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, October 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Supreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले?

Our Media by Our Media
September 30, 2021
in राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
112 2
0
Supreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले?
25
SHARES
817
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : Supreme Court : दिल्लीच्या विविध सीमांवर रस्ते अडवून बसलेल्या शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. ३०) झालेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारला केली.

गेल्या वर्षभरापासून शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडले आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

शेतकर्‍यांना हटविण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली असून यावर सुनावणी करताना न्यायालयाने कोणताही महामार्ग कायमचा बंद केला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणीही केली.

केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन चालविलेले आहे. दिल्लीतील काही सीमांवर शेतकर्‍यांनी तंबू ठोकून ठाण मांडले आहे.

यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी, रस्ते बंद राहणे, मार्ग बदलणे आदी संकटांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य दिल्लीकर या सार्‍या प्रकाराने वैतागून गेलेला आहे.

या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. कोणत्याही समस्येचा निपटारा न्यायालय, आंदोलन किंवा संसदेतील चर्चेच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. पण रस्ते कायमचे अडवून धरले जाऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केली.

आम्ही याआधीच कायदे बनविलेले आहेत आणि ते लागू करण्याची जबाबदारी तुमची आहे, असे सांगत खंडपीठाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढली.

यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तीन सदस्यांची समिती बनविलेली आहे. चर्चेत आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी सामील व्हावे, असे निर्देश देण्यात आले होते. पण ते बैठकीत सामील झाले नाहीत, असे सांगितले.

या प्रकरणावर पुढील सुनावणी येत्या सोमवारी (दि. ४) होणार आहे.

Previous Post

माझ्या हद्दीत अवैध धंदे वाल्यांची गय केली जाणार नाही : ठाणेदार नितीन देशमुख

Next Post

गर्भवती पत्नीचा पती आणि सासरच्यांनी साडीने आवळला गळा, कारण वाचून तुम्हाला राग आवरणार नाही

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Next Post
Crime

गर्भवती पत्नीचा पती आणि सासरच्यांनी साडीने आवळला गळा, कारण वाचून तुम्हाला राग आवरणार नाही

Exam

नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्यास, 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.