• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, November 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

घंटानाद ! घटस्थापने पासून मंदिरे, ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
125 1
0
घंटानाद ! घटस्थापने पासून मंदिरे, ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू
27
SHARES
902
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा तर 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचा अखेर सरकारचा निर्णय झाला आहे.

येत्या 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केला.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

मुख्यमंत्री म्हणाले, भक्तांची गर्दी रोखण्याची जबाबदारी मंदिर व्यवस्थापनावर राहील. कोरोनाच्या रुग्णसंख्येत उतार असला तरी सावध राहावे लागेल. सर्व प्रार्थनास्थळांवर आरोग्याचे नियम पाळावे लागतील. मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर झालाच पाहिजे.

जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटविण्यास सुरुवात करताना राज्य सरकारने मंदिरे व इतर धार्मिक स्थळे मात्र बंदच ठेवली. त्यामुळे मंदिरे उघडा, असा घंटानाद, शंखनाद सुरू झाला. भाजप, मनसेने आंदोलन केले. तरीही देऊळबंदच्या निर्णयावर सरकार ठाम राहिले. गणेशोत्सवावरदेखील कडक निर्बंध लादण्यात आले. आता गणपतीनंतरही राज्यात सध्या रोज तीन ते साडेतीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. दुसर्‍या लाटेचा हा नीचांकी स्तर मानला जातोे. तिसरी लाट येणार म्हणून जे मुहूर्त सांगितले गेले ते महाराष्ट्राने चुकीचे ठरवले. त्यात लसीकरणाचाही मोठा वाटा आहे. 8 कोटी 60 लाख नागरिकांना डोस दिल्याने प्रतिकारशक्ती निर्माण झाली. संसर्ग दर घटला. त्यामुळेच नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच घटस्थापनेला 7 ऑक्टोबरपासून सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला.

४ ऑक्टोबरपासून शाळा होणार सुरू

येत्या 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी केली. कोरोना टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली, असे त्या म्हणाल्या.

शाळा सुरू होणार ही विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदवार्ता असली तरी शाळा सुरू करण्यासाठी घातलेल्या अटी आणि शर्ती पाहता मुलांना घरीच ठेवलेले बरे असा विचार करण्याची वेळ पालकांवर येईल अशी स्थिती आहे.

शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल. या मंजुरीसाठी पालकांना सक्ती करू नये, असे आदेश शाळांना दिले जातील. प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे आवश्यक, विद्यार्थ्यांचे तापमान तपासले जाईल, सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. त्यासाठी सीएसआर किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा. शाळा सुरू होणार असल्या तरी गृहपाठ मात्र एक तर वर्गातच करून घ्यावा किंवा ऑनलाईन घ्यावा लागेल. पुस्तकांची अदलाबदल टाळण्यासाठी ही सूचना करण्यात आली आहे. ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छ्वास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले, ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले, उलट्या जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात येताच त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था शाळांना करावी लागेल.

  • मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे
  • स्कूलबस – खासगी वाहनातून एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घ्यावी.
  • विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना सॅनिटायझरचा वापर आवश्यक.
  • सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
  • खो-खो, कबड्डी इत्यादी टाळावे. क्रिकेट, शारीरिक शिक्षणास परवानगी. मात्र, मास्क व 2 मीटर अंतर राखणे आवश्यक.

शाळांच्या निर्णयावर स्वागत आणि चिंताही

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून पालक वर्ग तसेच शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे; तर काही ठिकाणी अजूनही कोरोनामुळे आरोग्याची चिंता व्यक्त करत पूर्ण लसीकरणाची मागणी होत आहे. गेल्या दीड वर्षापासून ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणापासून वंचित राहून बालमजुरी करणार्‍या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाता येणार असल्याने या बालकांसाठी काम करत असलेल्या संस्थांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर ग्रामीण भागातील शिक्षकांनी शाळा पहिलीपासून सुरू कराव्यात, अशीही मागणी करत पायाभूत सुविधांची मागणी केली आहे

Tags: Schooltempleuddhav thakre
Previous Post

तेल्हारा येथे भाजयुमो तर्फे कोरोना लसीकरण शिबीर व कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हानानुसार सेवा व समर्पण अभियान अंतर्गत आयोजन

Next Post

यूपीएससीत महाराष्ट्रातून ५० उमेदवार यशस्वी

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
Next Post
युपीएससी, एमपीएससी स्पर्धा

यूपीएससीत महाराष्ट्रातून ५० उमेदवार यशस्वी

Health Department : आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली

Health Department : आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.