• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

शाळा (school) सुरू करण्याचा निर्णय, २५ जिल्ह्यांत १७ रोजी वाजणार घंटा

Team by Team
August 7, 2021
in शिक्षण
Reading Time: 1 min read
170 2
0
राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा
26
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या 25 जिल्ह्यांतील शाळा (school) येत्या 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

गेल्या मार्च 2020 पासून राज्यातील शाळा (school) कोरोनामुळे बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत.

हेही वाचा

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

गेल्या एक ऑगस्टला ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा (school) सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

सद्य:स्थितीत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. राज्याच्या 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे येथील शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी फाईल पाठवली आहे.

सद्य:स्थितीत आठवी ते बारावीच्या राज्यभरात 36 हजार 835 शाळा आहेत. या शाळांत 86 लाख 33 हजार 805 विद्यार्थी आहेत.

त्यापैकी केवळ जुलैअखेर आलेल्या आकडेवारीत केवळ 9 लाख विद्यार्थी शाळेत दाखल झाले असल्याचे दिसून आले आहे.

एकूण विद्यार्थ्यांपैकी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 10.41 टक्के असल्याचे दिसून आले.

यासाठी ग्राम पातळीवरही अधिकार देत आठवी ते बारावीच्या शाळा राज्यभरात सुरू आहेत.

मात्र याला कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

बहुतांश ग्रामपंचायतींनी परवानगी न दिल्याने शाळाच बंद असल्याचे दिसून येत आहे.

नागपूर आणि अमरावती विभाग वगळता फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

पुणे आणि मुंबई विभागात शाळा फारशा उघडल्याच नाहीत.

या पार्श्वभूमीवर माध्यमिक सोबत प्राथमिक वर्ग सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

85 टक्के पालकांची मागणी

अन्य वर्गांच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने एमसीईआरटीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात शाळा सुरू करण्याबाबत पालकांची सकारात्मक भूमिका दिसून आली.

नववी, दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वाधिक सहभाग नोंदवला.

त्याखालोखाल सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला आहे.

शहरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा अधिक समावेश होता.

यात सुमारे 85 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.

अन्य वर्गही सुरू करण्यासंदर्भात पालकांकडून होत असलेल्या मागणीमुळे शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

15 टक्के फी कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे…

खासगी शाळांची फी 15 टक्के कमी करण्याचा निर्णय झाला.

तरी मुख्यमंत्र्यांकडून आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी होईल, असेही मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत.

पगार कपातीचाही अनेकांना फटका बसल्याने विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क कमी घेण्याबाबत शासनाने सर्व शिक्षण संस्थांना आदेश द्यावेत, अशी विनंतीही शिक्षण विभागाने केली आहे.

Tags: School Opening Maharashtra
Previous Post

437 अहवाल प्राप्त, पाच पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज ; रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह

Next Post

सोयाबीनचे दर दहा हजारा वर ; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही !

RelatedPosts

MPSC
Featured

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

December 3, 2024
देवेंद्र फडणवीस
Featured

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

November 13, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
Featured

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

October 23, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

September 20, 2024
admission
Featured

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

September 19, 2024
Next Post
Soya Bean

सोयाबीनचे दर दहा हजारा वर ; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही !

सासू नाही आई! चार सुनांकडून अंत्ययात्रेदरम्यान सासुला खांदा

सासू नाही आई! चार सुनांकडून अंत्ययात्रेदरम्यान सासुला खांदा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.