• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, September 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हे कसले निर्बंध? हा तर लॉकडाऊनच!

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
लॉकडाऊन
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सोमवारपासून लागू झालेले कडक निर्बंध म्हणजे कडकडीत लॉकडाऊनच असून, औषध दुकाने आणि किराणा दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठेला सरकारने टाळेच ठोकल्याने राज्यभरातील बाजारपठांत सन्‍नाटा आणि संताप निर्माण झाला असून, हा अघोषित लॉकडाऊन तत्काळ मागे घ्या आणि कडक नियमांसह बाजारपेठ उघडा, अशी मागणी करीत व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या अघोषित लॉकडाऊनला आक्षेप घेतला आहे.

सकाळी 7 ते संध्याकाळी 8 फक्‍त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, बाकी सर्व दुकाने बंद राहतील, असे सरकारने जाहीर केले. सोमवारपासून या तथाकथित निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होताच बाजारपेठा बंद झाल्या. जी दुकाने उघडी होती ती पोलिसांनी बंद केली. 9 एप्रिलपर्यंत बाजारपेठा अशाच बंद राहणार असल्याने सामान्य जनतेसह व्यापारीवर्ग अस्वस्थ झाला आहे.

हेही वाचा

ई भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून, भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. – वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

अन्यथा असहकार आंदोलन

या विषयावर चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड कमिटीची सोमवारी मध्यरात्री ऑनलाईन बैठक झाली. राज्यातील 100हून अधिक व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. सोमवारपासून लागू झालेला अघोषित लॉकडाऊन तत्काळ रद्द करण्यासाठी राज्य सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम या बैठकीतून देण्यात आला.  सरकारने व्यापारी व दुकानांतील कामगारांचा विचार करत निर्णय रद्द केला नाही, तर असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी दिला. सरकारने व्यापारी संघटनांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कोणत्याही प्रकारची चर्चा न करता संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

रिटेलर्स असोसिएशन्स ऑफ इंडियाचे (राय) कुमारराज गोपालन म्हणाले की, हा ‘रिटेल लॉकडाऊन’ आहे. बाजारच बंद केल्याने दुकानदारांचा रोजचा खर्च सुरूच राहणार आणि कमाई मात्र थांबणार. यातून कधीही न भरून येणारे नुकसान होईल. म्हणजे दुकाने बंद असली तरी किरकोळ व्यापार्‍यांना वीज बील भरावे लागणार, मालमत्ता करही भरावे लागणार. याचा थेट परिणाम केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नव्हे तर देशातील किरकोळ व्यापार जगताच्या परिस्थितीवर होऊ घातला आहे. खासकरून निर्मिती क्षेत्राला फटका बसेल आणि लाखोंचा रोजगार बंद होईल. त्यामुळे राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेत येत नसलेली दुकानेही कोरोनाचे कडक नियम लागू करून सुरू ठेवावीत.

कापड उद्योगातील मोठे नाव असलेले उद्योजक विरेन शहा म्हणाले, गेल्या वर्षी सलग आठ महिने आमची दुकाने बंद राहिली. त्या लॉकडाऊनमधून आम्ही आता कुठे सावरू लागलो असतानाच पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. आमचा किरकोळ व्यापाराचा उद्योग साधारण 10 लाख लोकांना रोजगार देतो. या लॉकडाऊनमुळे उत्पन्‍नच थांबल्याने आम्हाला एक तर नोकरकपात करावी लागेल किंवा वेतनकपात. या अघोषित लॉकडाऊनचा फटका राज्यातील हॉटेल आणि ओघानेच पर्यटन उद्योगालाही बसणार आहे. कोरोना साथीमुळे आधीच या क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे सांगून हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष के. बी. कचरू म्हणाले, नवे निर्बंध लागू झाल्याने महाराष्ट्राचे पर्यटन आणखी खाली जाईल.

सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल आणि दारूची दुकाने मागच्या लॉकडाऊनप्रमाणे सुरू करण्यास परवानगी देईल, अशी आशा मद्य उद्योगाला वाटते. नव्या लॉकडाऊनचा फटका मद्य उद्योगाप्रमाणेच राज्य सरकारच्या तिजोरीलाही मोठ्या प्रमाणात बसेल. त्यामुळे अबकारी खात्याशी संपर्क साधून आम्ही कोरोनाचे नियम पाळून मद्यविक्रीस परवानगी मागणार असल्याचे प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर व्हेेंडर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद मिस्किन म्हणाले.

मालवाहतुकीला 315 कोटींचा फटका

राज्यातील ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लादलेल्या निर्बंधांमुळे माल वाहतूक क्षेत्राला दररोज तब्बल 315 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याची प्रतिक्रिया ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोअर कमिटीचे चेअरमन बाल मल्कित सिंह यांनी व्यक्त केली आहे. सिंह म्हणाले की, गेल्या वर्षी पुकारलेल्या लॉकडाऊनच्या नुकसानातून अद्याप मालवाहतुकदार सावरलेले नाहीत. त्यात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने बंद असल्याने सुमारे 50 टक्क्यांहून अधिक मालवाहतूक वाहनांची चाके थांबली आहेत. अशा परिस्थितीत मालवाहतुकदारांसमोर विविध कर, वाहनाचा ईएमआय, चालक व वाहकाचा पगार असे विविध प्रकारचे निश्चित खर्च भागवण्याशिवाय पर्याय नाही. त्यात रात्रीच्या संचारबंदीमुळे मालाची चढ-उतार कऱण्यासाठी कामगार मिळत नसल्याने ई-वे बिलची मुदत संपत असून वाहतुकदारांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत आहे. म्हणूनच ई-वे बिलमधील दंडातून सूट देत कर्जाचे हफ्ते थकल्यास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य शासनाकडे केंद्रीय यंत्रणांना करावी, अशी मागणी संघटनेने केल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांचे पत्र

केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन करणार असल्याचे फोनवर सांगितल्याने भाजपाने त्यास सहमती दर्शवली होती,मात्र प्रत्यक्षात इतर पाच दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आले असून त्यामुळे छोटे व्यवसायी आणि जनमानसात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व घटकांशी पुन्हा एकदा चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. अनेक बाबतीत संलग्नता न पाहता निर्बंध लादले आहेत. वाहतूक (ट्रान्सपोर्टेशन) खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर पार्टस दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली याकडे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

Tags: lockdown in maharashtraलॉकडाऊन
Previous Post

Mini Lockdown : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे सूचवले

Next Post

स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे, व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस पालकमंत्र्यानी दाखवावे – राजेंद्र पातोडे

RelatedPosts

Featured

ई भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून, भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. – वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला

September 25, 2025
बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
Featured

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

September 25, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
लाखो रेशन कार्ड रद्द करण्याचा सरकारचा नवा निर्णय नागरिकांच्या हक्काचा घास हिरविणारा सदर निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन – राजेंद्र पातोडे

स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे, व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस पालकमंत्र्यानी दाखवावे - राजेंद्र पातोडे

राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण ;लसीकरणासंबंधीत राजेश टोपेंचे मोठे विधान

केंद्राकडून लस न मिळल्यास तीन दिवसांनंतर राज्यातील लसीकरण बंद पडणार : आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

September 25, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025

ई भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून, भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. – वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला

September 25, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.