• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, November 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रुग्णालयात ना डॉक्टर, ना बेड्स, जमिनीवर गादी टाकून होत आहे उपचार; एकाच दिवसांत 6 रुग्णांचा मृत्यू

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 18, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
रुग्णलयात ना डॉक्टर, ना बेड्स, जमिनीवर गादी टाकून होत आहे उपचार; एकाच दिवसांत 6 रुग्णांचा मृत्यू
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र रुग्णांच्या तुलनेत सर्वोपचार रुग्णालयात खाटा आणि मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांना काही काळ जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. डिस्चार्जनंतर बेड खाली झाल्यानंतर संबंधित रुग्णाला खाटेवर घेतले जात असल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यासारखी स्थिती आहे. कोविडसाठी ४५० खाटा राखीव असलेले सर्वोपचार रुग्णालय फुल झाल्यानंतर दाखल होणाऱ्या रुग्णांना काही काळ खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे. वेळप्रसंगी गंभीर रुग्णावरही अशाच स्थितीत उपचार करावे लागत आहेत. तर दुसरीकडे तज्ज्ञ डाॅक्टरांची संख्या कमी असल्याने एका डाॅक्टरवर चार वाॅर्डांतील कामाचा ताण येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. रुग्णसंख्या याच गदीने वाढल्यास रुग्णसेवा कोलमडून जाऊन परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कोविडसेवेत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे.

 

गरज १३ औषधवैद्यक तज्ज्ञांची; आहेत ३
सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना वाॅर्डातील रुग्णसंख्या आणि नॉनकोविड रुग्णसेवा बघता किमान १३ औषधवैद्यक तज्ज्ञांची गरज आहे. मात्र सद्य:स्थितीत तीन औषधवैद्यक तज्ज्ञांवर रुग्णसेवेचा भार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी शासनाकडे मागणीही करण्यात आली आहे. रुग्णांची संख्या वाढली कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने अतिरिक्त खाटा कशा वाढवता येतील, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. अनेक रुग्णांना केअर सेंटरमध्ये पाठवत आहे. डॉ. मीनाक्षी गझभिये, अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय. तत्काळ दखल घ्या गैरसोयीविषयी रुग्ण व नातेवाईक कॉल करून मौखिक तक्रार करतात. खाली गादी टाकून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ येऊ नये. या गंभीर बाबीची तत्काळ दखल घ्यावी. आशिष सावळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना.

 

भयंकर : एकाच दिवसांत कोरोनामुळे सहा रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाची दहशत वाढत असून, मृत्यूंची संख्या वेगात वाढत आहे. बुधवारी, १७ मार्चला एकाच दिवसांत तब्बल सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये ८० वर्षीय तीन रुग्ण, ९० वर्षीय एक आणि ६० व ६५ वर्ष अशा दोन रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान दिवसभरात कोरोनाचे ४७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ४८५ रुग्णांना सुटी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या २२,७०८ झाली आहे. १७,२५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ५,०४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

६ रुग्णांचा मृत्यू : पळसोबढे येथील ८० वर्षीय महिला रुग्ण, पातूर येथील ८० वर्षीय महिला रुग्ण; टिटवा ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष ; पोळा चौक, अकोला येथील ९० वर्षीय पुरुष ;उमरा, अकोट येथील ६५ वर्षीय पुरुष ; सावरा, अकोट येथील ८० वर्षीय पुरुष. रॅपिडमधून ६० पॉझिटिव्ह : गेल्या २४ तासात रॅपिडच्या ३११ चाचण्यांत ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अकोटचे पाच, पातूरचे दोन, तेल्हाऱ्याचे तीन, मूर्तिजापूरचे १० अहवाल पॉझिटिव्ह आले.आयएमए येथे १०, वैद्यकीय महाविद्यालयातून ३० अहवाल पॉझिटिव्ह आले.

गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले
अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह लगतच्या जिल्ह्यातील गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. बुधवारी १७ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास दाखल रुग्णांची संख्या सुमारे ४१० होती. सर्वोपचार रुग्णालयात जमिनीवर गादी टाकून रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत.

 

स्मशानभूमीत मिळेल त्या जागी अंत्यसंस्कार
मृतकांची संख्या अचानक वाढल्याने स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठीच्या प्रस्तावित जागाही फुल झाल्या आहेत. त्याठिकाणच्या अस्थी व रक्षा संकलनाला वेळ द्यावा लागतो. सध्या कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने प्रस्तावित जागांव्यतिरीक्त स्मशानभूमी परिसरात मिळेल त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृत रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे.

Tags: akola corona updatesakola newsCoronaVirusmarathi news
Previous Post

थकीत वीज देयकासाठी खांबोरा आणि घुसर पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणतर्फे खंडित

Next Post

नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्या कडून विद्यार्थीना होणारे त्रास व अरेरावी ची भाषा त्वरित थांबविण्यात यावी अन्यथा ठिय्या ठोको आंदोलन

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्या कडून विद्यार्थीना होणारे  त्रास व अरेरावी ची भाषा त्वरित थांबविण्यात यावी अन्यथा ठिय्या ठोको आंदोलन

नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्या कडून विद्यार्थीना होणारे त्रास व अरेरावी ची भाषा त्वरित थांबविण्यात यावी अन्यथा ठिय्या ठोको आंदोलन

खोदलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण  करा,अन्यथा तेल्हारा धुळीचा तालुका म्हणून घोषित करा   तेल्हारा विकास मंचची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खोदलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करा,अन्यथा तेल्हारा धुळीचा तालुका म्हणून घोषित करा तेल्हारा विकास मंचची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.