• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, November 4, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाची सर्व राज्यांना नोटीस

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार
19
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली असून न्यायालयाने पहिल्याच दिवशी आरक्षणाच्या विषयावरून सर्व राज्यांना नोटीस बजावली आहे. 15 मार्चपासून सलगपणे या प्रकरणाची सुनावणी घेतली जाणार असल्याचे न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या घटनापीठाने स्पष्ट केले.

अनेक राज्यांमधील आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून इतर राज्यांचा देखील पक्षकारांत समावेश केला जावा, अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली. ही विनंती ग्राह्य धरत सर्व राज्यांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घटनापीठाने घेतला. मराठा आरक्षण खटल्याचा निकाल देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालय 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाबाबतचा विविध राज्यांचा तर्क जाणून घेणार आहे. मराठा आरक्षण खटल्याच्या संभाव्य निकालाचा परिणाम इतर राज्यांवर पडणार आहे, त्यामुळे राज्यांचे मत जाणून घेण्याची गरज असल्याची टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

विविध राज्यांनी आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी केलेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यात घटनेच्या कलम 342 ए बाबतच्या व्याख्येचाही समावेश असल्याचे ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायण यांनी सुनावणीदरम्यान सांगितले. कलम 342 ए चा विविध राज्यांवर प्रभाव पडतो, त्यामुळे इतर राज्यांची बाजू ऐकणे व त्यांना पक्षकार करणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्राचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले. रोहतगी यांनी सुनावणीस होत असलेल्या विलंबाचा मराठा समाजावर परिणाम होत असल्याची टिप्पणी केली. कपिल सिब्बल, पी. एस. पटवालिया या वकिलांनीदेखील रोहतगी यांच्या म्हणण्याचे समर्थन केले.

कोरोना संकटामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटल्याची सुनावणी सुरू आहे. सुनावणी प्रत्यक्ष सर्व पक्षकार आणि वकिलांच्या उपस्थितीत घेतली जावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. तथापि कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे न्यायालयाने तूर्तास व्हर्चुअल मार्गानेच सुनावणी घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे.

मराठा आरक्षणावरील खटल्याची सुनावणी मोठ्या घटनापीठासमोर केली जावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला याआधीच करण्यात आलेली आहे. 8 ते 18 मार्च या कालावधीत मॅरेथॉन सुनावणी घेतली जाईल, असे 5 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तथापि हे वेळापत्रक न्यायालयाने रद्दबातल केले आहे. पुढील सुनावणी 15 मार्चपासून सलगपणे होईल. दरम्यान तामिळनाडूतील 50 टक्क्यांपेक्षा जास्तचे आरक्षण, आर्थिकदृष्टया दुर्बलांना दिले जात असलेले आरक्षण यावरूनही न्यायालयाने विविध राज्यांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील आरक्षणाची मर्यादा तब्बल 69 टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे.

9 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. तत्पूर्वी 2018 साली तत्कालीन भाजप-सेना सरकारने कायदा करून मराठा आरक्षणाला मंजुरी दिली होती. मराठा आरक्षण कायद्यानुसार शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. या कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने कायदा घटनेनुसार असल्याचे सांगत आरक्षण कायम ठेवले होते. त्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला होता. घटनेनुसार, 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, असा आक्षेप कायद्याला विरोध करणाऱ्यानी घेतला होता. जुलै 2020 मध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. पण, सप्टेंबर महिन्यात अंतरिम आदेशात आरक्षण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. पुढील निर्णय घटनापीठ देत नाही, तोपर्यंत आरक्षण देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी नमूद केले होते.

Tags: Maratha Aarakshan
Previous Post

अकोट हिवरखेड खंडवा रेल्वेमार्ग बनणार तरी कधी?अकोट पर्यंत रेल्वेगाड्या तात्काळ सुरू करा.. प्रवाशांची मागणी

Next Post

सहा राज्यांत कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ, महाराष्ट्रात संख्या सर्वात जास्त

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
Next Post
सहा राज्यांत कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ, महाराष्ट्रात संख्या सर्वात जास्त

सहा राज्यांत कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ, महाराष्ट्रात संख्या सर्वात जास्त

जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी यांनी केला महिला बिएलओचा सन्मान

जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी यांनी केला महिला बिएलओचा सन्मान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.