अकोट(देवानंद खिरकर )-अकोट नगर परिषदेतील घरकुल प्रकरणी तसेच विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचेयांनी सपत्नीक शेकडो लाभार्थ्यांसह तसेच शिवसैनिकांसह नगरपरिषद कार्यालय अकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अपंग बांधव कैलास वानखडे यांच्या हस्ते करून आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.
नगर परिषदेमधील घरकुल योजनेचा लाभ गरजु नागरीकापर्यंत अद्यापही पोचलेला नाही.हे सतत निदर्शनास येत असुन शहरातील नागरीकांच्या या विषयावर सततच्या तक्रारी येत आहेत.त्याबाबत नगरपालिका महसूल विभाग तहसील कार्यालय यांना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी स्वतः तसेच पत्नी नगरसेविका सौ.विजया दिलीप बोचे यांच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन दिले.परंतु आज गोरगरीब जनतेविषयी कोणत्याही अधिकाऱ्याची भूमिका ही सकारात्मक दिसली नाही करीता उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे हे सपत्नीक शेकडो शिवसैनिकांसह नगर परिषद परिसरात आज दिनांक १९/१०/२०२० सकाळी ११:०० वाजता पासुन कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती पाहता सामाजिक अंतर पाळत आवश्यक ती काळजी घेत
आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.यावेळी या जनहिताच्या उपक्रमास उपोषणस्थळी विविध पक्षाचे नेते तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट दिली त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे मा.आमदार संजय भाऊ गावंडे,शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,शहर प्रमुख सुनील रंधे,जिल्हा परिषद सदस्य सौ.गीताताई मोरे,पंचायत समिती सदस्य सौ.हरिदिनी वाघोडे,पंचायत समिती सदस्य मुरलीधर खोटे,जेष्ठ शिवसैनिक विजय ढेपे,कांग्रेस चे माजी नगरसेवक संजय आठवले,रमेश पाटील खिरकर,शिवसेना आदिवासी तालुका अध्यक्ष सुभाष सुरत्ने,चेतन मर्दाने,रवींद्र केवटी,कदिर शहा,आदिवासी युवक संघटना जिल्हाध्यक्ष बबलू मोरे,शहर संघटक रोशन पर्वतकर,युवासेना तालुका संघटक कुणाल कुलट,यांनी भेट दिली.तसेच या जनहिताच्या उपोषणाला आज दिवसभरात विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामध्ये असंघटित कामगार संघटना काँग्रेस,महाराष्ट्र नाभिक महामंडळ,महाराष्ट्र सफाई कामगार संघटना,आदिवासी संघटना यांनी पाठिंबा दिला.यावेळी माजी नगरसेवक दिवाकर गवई,संगीता फुलंबरकर,मीनाताई पौड,गीता मोरे,सौ.किरण किल्लेदार,संजय भट्टी,प्रदीप कदम,प्रकाश गाडगे,प्रमोद जाधव,संकेत जाधव,प्रकाश मंगवानी,धीरज गावंडे,योगेश सुरत्ने,देवानंद मोरे,संजय पालखेडे,अमोल बरदखे,मंगेश निबोळकर,सोपान साबळे,विजय भारसाकळे,पिंटू वानखडे,गोविंद चावरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक तसेच लाभार्थी उपस्थित होते.
आज मागण्या खालीलप्रमाणे…
१)ज्या कुटूंबाकडे स्वताचे मालकीची जागा नसेल व त्यांचेकडे ताबा पावती असेल व ते अनेक वर्षापासुन नगरपरीषद हद्दीत वा नझूलच्या जागेवर राहतात त्यांना शासकीय जागांचा मालकी हक्क (लिज पट्टा) करुन पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल देण्यात यावे.२)अकोट शहरातील व प्रभाग क्रमांक १० मधील पिढीजात वास्तव्य करीत असलेल्या अतिक्रमन धारकांना राहत्या जागेचा भाडेपट्टा करुण देण्यात यावा.३) रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थाना त्वरीत घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा ४)एकुण लाभार्थांपैकी शासकीय नियमावलीप्रमाने ५% अपंग लाभार्थांना घरकुल योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा.५) ज्यांचेकडे स्वताच्या नावाने ७/१२, नमुना ‘ड’, कलेक्टर लेआउट, एस.डी.ओ. लेआऊट, तहसीलदार लेआऊट, गुंठेवारी जागा आहे.अशा अतिक्रमन धारकांचे अतिक्रमन नियमीत करुन त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ देणयात यावा.६)अतिक्रमण धारकांचा डि.पी.आर. त्वरीत मंजूर करण्यात यावा.७) अकोट शहरातील जवळपास ४००० अर्ज घरकुल योजनेकरीता प्राप्त झाले असुन पैकी २०३८ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. परंतू त्यातील ४०० नागरीकांनाच अद्यापप्रयंत घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरीत १६३८ प्रकरणांचा त्वरीत निपटारा करावा.८)शेतकरी,शेतमजूर,अपंग,विधवा, परितक्त्या,निराधार या केशरी (APL) कार्डधारकांना प्राधान्य गटात समावेश करुन BPL दराने धान्यपुरवठा करण्यात यावा.९) साफसफाई कर्मचारी यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा.