• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नोकरी गेलेल्यांना तीन महिन्यांचा अर्धा पगार मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Team by Team
August 21, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
नोकरी
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : 

कोरोना संकटकाळात नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा अर्धा पगार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, राज्य विमा महामंडळाचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी बेरोजगार भत्त्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

मार्च महिन्याच्या मध्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्चच्या अखेरीस देशव्यापी लॉकडाऊन लागू केला होता. दोन महिने कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आल्यानंतर 1 जूनपासून अनलॉकिंग मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. नोकरी गेलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी आता केंद्र सरकारने तीन महिन्यांचा अर्धा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना संकटाचा फटका बसलेल्या बेरोजगारांना मदत करण्यासाठी नियम शिथिल करण्याची मागणी काही काळापासून सुरु होती. या मागणीचा विचार करत सरकारने बेरोजगार भत्त्याचे नियम शिथिल केले आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे २४ मार्च ते ३१ डिसेंबपर्यंतच्या कालावधीत कर्मचारी तीन महिन्यांच्या (९० दिवस) ५० टक्के पगारावर दावा करण्यास पात्र असणार आहेत. मात्र यासाठी ते किमान दोन वर्षांसाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) कर्मचारी राज्य विमा योजनेशी जोडलेले असणे अनिवार्य असणार आहे.

योजनेचा फायदा घेण्यासाठी १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत किमान ७८ दिवसांसाठी कामगारांचे योगदान आवश्यक आहे. तीन महिन्यांच्या ५० टक्के पगारावर कर्मचारी दावा करु शकतात. आधी ही मर्यादा २५ टक्के होती. अन्य एका नियमात सरकारने बदल केला आहे. आधी बेरोजगार झाल्यानंतर ९० दिवसांनंतर याचा फायदा घेतला जाऊ शकत होता. पण आता ही मर्यादा कमी करत ३० दिवसांवर आणण्यात आली आहे.

देशभरातील सुमारे ३० ते ३५ लाख कामगारांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. जे कामगार एका मर्यादेपर्यंत कमाई करु शकतात, त्यांच्यासाठी राज्य कर्मचारी विमा योजना उपलब्ध करून दिली आहे. ज्या फॅक्टरीमध्ये १० पेक्षा जास्त कामगार असतात तिथे ही योजना लागू होत नाही. तसेच पगार २१ हजारांपर्यंत असेल तरच सदर योजनेचा लाभ घेता येतो.

Tags: नोकरीबेरोजगारबेरोजगार योजनामोदी
Previous Post

मूर्तिजापूर शहरात जुगार अड्डयावर धाड…१४ जणांना रंगेहात पकडले…पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांची कारवाई…

Next Post

अखेर आ.अमोल मिटकरींनी गावकऱ्यांच्या भावना जाणल्या अन थेट मृत्यूचे थैमान घातलेले चितलवाडी गाठले

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
Next Post
अमोल मिटकरी

अखेर आ.अमोल मिटकरींनी गावकऱ्यांच्या भावना जाणल्या अन थेट मृत्यूचे थैमान घातलेले चितलवाडी गाठले

भाजपा

भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.