अकोला(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार गुरुवार (दि.20 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
काटेपुर्णा प्रकल्पामध्ये सोमवार (दि.17) रोजी सकाळी सात वा. 89.89 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच मोर्णा प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून इतरही प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे. प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तरी याबाबत नदीपात्रा जवळील गावांतील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेवून सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/ कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.