मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- सध्या संपूर्ण देशात कोरोणा विषाणूमूळे सामान्य जनतेचे जिवन जगणे कठीण झाले आहे. अनेक प्रकारचे नवनवीन नियमनामुळे सामान्य माणसाला अनेक प्रश्ननामुळे जिवन जगणे कठीण झाले.
असतांनाच मजुरांची यामध्ये प्रामुख्याने वाताहत झाली आहे. अशातच एक प्रमुख असलेल्या बँड पाट्री संचालकासस कलाकारावर या कोरोणा काळात उपाशी राहण्याची वेळ आली आहे.यामुळे नियमित जिवनक्रम ही थांबल्या सारख्या झाले आहे. करोणा दहशतीमुळे दुहेरी संकट आले ते उपेक्षित अशा बँन्ड कलाकारावर तथा व्यावसायिकावर लग्नसराईच्या चार महिण्याच्या वाजंत्री व्यवसाय आणि वर्षभर अर्धपोट भरण्याची सोई परंतु समाज उपयोगी बँन्ड कलाकारांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या कठीण काळात शासनाने महत्वाचे मदतकार्य योजना जाहीर केल्या आहेत .परंतु जिवनभर आपल्या सोबत अनेक सुख दु:खाच्या प्रसंगात साथ देणारा बारा बलुतेदार पैकी प्रमुख मातंग समाजातील वाजंत्री बँन्ड कलाकार मात्र दुर्लक्षित राहीला आहे. शासनाने त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ दयावी असे एक निवेदन राष्ट्रीय लहुशकती संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते यांना देण्यात आले आहे. निवेदनात लग्न तथा इतर कार्यक्रमामधे बँन्ड वादकांच्या वाहनासह १० कलाकारांच्या पथकाला मान्यता दयावी,हजारो वर्षे ज्यांनी समाजाची सेवा केली अशा समाज बांधवासोबत न्याय करावा.असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्वराव ठाकरे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, नेताप्रतिपक्ष प्रविण दरेकर यांनीही देण्यात आल्या आहेत. निवेदनावर वासुदेवराव धुरदेव,दिनेश गायकवाड, गजानन खडसे, रमेश गव ई,नरेंद्र आमटे, विलास सावळे,अक्षय गवई,सुरेश गायकवाड, महादेवराव गायकवाड, राजु वानखडे, अनिल धुरदेव,श्रावण धुरदेव,विजय खंडारे,पुंडलिक खडसे, प्रकाश आमटे आदी बँन्ड संचालकाच्या स्वाक्षरी आहेत.