रिधोरा ( पंकज इंगळे ) : आज दिनांक 21 जून 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांना मेल द्वारे पत्र देऊन 15 मार्च 2020 पासून राज्य शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालय व ईतर काही गोष्टी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या होत्या. परंतु नंतर ह्या भयंकर आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक 24 मार्च 2020 पासून सर्व देशासह राज्यामध्ये सुद्धा पूर्णपणे लॉक डाउन घोषित करण्यात आला.व सर्वच कामकाज ठप्प झाले. त्यामुळे आपल्या सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणारी स्वाधार शिष्यवृत्ती योजना 2019-20 ह्या शैक्षणिक सत्रामधील पात्र असलेले महाराष्ट्र राज्यातील असंख्य विद्यार्थी हे ह्या लाभापासून वंचित राहिले.
त्यामुळे असंख्य गोर – गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान लॉक डाउन च्या काळात योजनेसाठी लागत असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न करू शकल्यामुळे झाले. तरीसुद्धा अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेच्या शिष्यवृत्ती मिळाल्या नसून
खालीलप्रमाणे विदयार्थी नामे:
१)अमर ज्ञानदेव इंगळे
अर्जाचे स्वरूप:: नूतनीकरण
शिक्षण:: (B.S.W.)
२)सागर सुरेश किरतकार
अर्जाचे स्वरूप:: नूतनीकरण
शिक्षण:: (B.S.W.)
3)सुभाष विलास अवचार
अर्जाचे स्वरूप:: नूतनीकरण
शिक्षण:: (B.S.W.)
४)साक्षी दादाराव डोंगरे
अर्जाचे स्वरूप:: नूतनीकरण
शिक्षण:: 12 वी विज्ञान शाखा
५)पल्लवी नागोराव भगत
अर्जाचे स्वरूप:: नूतनीकरण
शिक्षण:: (ANM-2)
६)दिपाली आश्रोबा खिल्लारे
अर्जाचे स्वरूप:: नूतनीकरण
शिक्षण:: (B.S.W.)
७)कांता परशराम खिल्लारे
अर्जाचे स्वरूप:: नूतनीकरण
शिक्षण:: (B.S.W.)
८)निकिता ब्रह्मदेव दंदी
अर्जाचे स्वरूप:: नवीन अर्ज
शिक्षण:: (B.S.W.)
ह्या विद्यार्थ्यांसह असंख्य विविध शाखेतील अभ्याससक्रमातील विद्यार्थी आपल्या अर्जाची त्रुटी पूर्तता न करू शकल्यामुळे व कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपले हक्काच्या लाभापासून वंचीत राहू नये करीत अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी त्रुटी ची पूर्तता व नवीन अर्ज भरण्यासाठी तात्काळ मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, अकोला जिल्हासंघटक आकाश हिवराळे,विद्यार्थी नेते अमोल सिरसाट ह्यांनी मुख्यमंत्र्यासह समाजकल्याण मंत्र्या कडे मेल द्वारे पत्र पाठवून केली.