• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, September 18, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

लॉकडाऊनने बेरोजगारीत वाढ; जाणून घ्या, विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम

Our Media by Our Media
May 22, 2020
in शिक्षण, Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
jobs-loss
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – कोरोनाची महामारी आणि टाळेबंदी या दोन्ही कारणामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमी या संस्थेने बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. मार्चमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २३.८ टक्क्यांवरून २४.६ टक्के झाले आहे.टाळेबंदीदरम्यान कृषीची कामेही स्थगित करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढून १३.०८ टक्के झाली आहे. तर शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढून १४.५३ टक्के झाले आहे. सीआयएमईच्या अहवालानुसार रोजगाराचे प्रमाण ३९६ दशलक्षवरून ४११ दशलक्ष झाले आहे. तर बेरोजगार लोकांचे प्रमाण हे ३२ दशलक्षवरून ३८ दशलक्ष झाले आहे. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका नागरी विमान वाहतूक, प्रवास, आदरातिथ्य, किरकोळ विक्री, उत्पादन आणि स्वयंचलित क्षेत्राला बसला आहे.

हेही वाचा : राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना मिळाले घरपोच मद्य
प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्र
या क्षेत्राचे रोजगारात १२.७५ टक्के योगदान आहे. तर त्यामधून प्रत्य ५.७६ टक्के लोकांना तर अप्रत्यक्षपणे ७.१९ टक्के लोकांना रोजगार मिळत आहे. पर्यटन क्षेत्रामधून २०१८-१९ मध्ये ८७ दशलक्ष लोकांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. ही माहिती पर्यटन मंत्रालयाने वार्षिक २०१९-२० च्या अहवालात दिली आहे. भारतीय पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगातून सुमारे ३८ दशलक्षहून अधिक नोकऱ्या गमाविण्याची भीती आहे. तर या उद्योगातील सुमारे ७० टक्के मनुष्यबळ आहे. ही आकडेवारी केपीएमजी फायनान्शियल सर्व्हिसे आणि अॅडव्हायझरी कंपनीने १ एप्रिलला दिली आहे. प्रवास आणि पर्यटन उद्योगातील नऊ दशलक्ष म्हणजे गोव्याच्या लोकसंख्येच्या सहापट लोकसंख्या ही नोकऱ्या गमाविण्याची भीती आहे. ही आकडेवारी जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेने दिली आहे.

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

विमान वाहतूक क्षेत्र-
सीएपीए इंडिया ही प्रवास आणि पर्यटन सल्लागार क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने विमान वाहतूक क्षेत्रातील चलनवलन हे ६६ टक्क्यांहून अधिक थंडावल्याचे एप्रिलमधील अहवालात म्हटले आहे. जागतिक विमान वाहतूक उद्योगाची संघटना आयएटीएने भारतामधील विमान वाहतूक क्षेत्राचे २० लाखहून अधिक नोकऱ्या धोक्यात असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता : ऊर्जामंत्री नितीन राऊत

वाहन उद्योग क्षेत्र
टाळेबंदीमुळे वाहन उद्योगाला अचानकपणे उत्पादन थांबवावे लागले आहे. त्यामुळे वाहन विक्री आणि उत्पादनात कमालीची घसरण झाली आहे. वाहन कंपन्यांचे बहुतेक उत्पादन प्रकल्प बंद आहेत. मोठ्या वाहन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतनकपात करणार असल्याचे जाहीर केले आहे. डीलरशिप देण्याच्या निर्णयावरही कंपन्या प्रतिक्षा करत आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्रावर टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. अॅनारॉक ग्रुपने गृहखरेदीच्या प्रमाणात २५ ते ३५ टक्के घसरण झाल्याचे म्हटले आहे. तर कार्यालये घेण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत १३ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. टाळेबंदीनेतर मनुष्यबळ स्थावर मालमत्ता क्षेत्रात परत येण्यासाठी काही आठवडे लागणार आहेत. रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी घाई होणार असल्याचे अॅनारॉकने म्हटले आहे.

एमएसएमई क्षेत्र
सरकारकडून मदत मिळत असली तर एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांचे नुकसानीवरील नियंत्रण संपूर्ण सुटले आहे. त्यांना महसूल मिळविता येत नसल्याने तग धरून राहण्यासाठी संघर्ष सुरू आहे. जर सरकारकडून कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर झाले नाही तर वस्त्रोद्योग साखळीतील १० दशलक्ष नोकऱ्या धोक्यात आहेत.

हेही वाचा : लघु उद्योगांसाठी मोठ्या घोषणा व निर्णय
निर्यात क्षेत्र

ऑर्डर रद्द होणार असल्याने तयार कपड्यांच्या क्षेत्रातील सुमारे २.५ ते ३ दशलक्ष नोकऱ्या जाण्याची भीती आहे. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक व्यापार थंडावला आहे. अशा संकटात निर्यात क्षेत्रातील १.५ कोटी लोकांहून अधिक जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने वर्तविला आहे.हेही वाचा-जागतिक बँकेचा भारताला मदतीचा हात; एवढे देणार अर्थसहाय्य

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी उद्योग)
येत्या काही महिन्यात भारतामधील विविध आयटी कंपन्यांमधील १.५ लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे.

असंघटित क्षेत्र
दोन आठवड्याच्या टाळेबंदीत देशात १९९ दशलक्षहून अधिक कामगारांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. तर शहरी भागात असंघटित अशा पाच क्षेत्रात ९३ दशलक्ष कामगार आहेत. त्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. ही आकडेवारी कामगार मनुष्यबळ सर्वेक्षण २०१७-१८ मध्ये दिलेली आहे. यामध्ये उत्पादन क्षेत्र (28 दशलक्ष), व्यापार, हॉटेल आणि रेस्टॉरंट (३२ दशलक्ष), बांधकाम (१५ दशलक्ष), वाहतूक, साठवणूक आणि संवाद (११ दशलक्ष) आणि वित्त, व्यवसाय आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र (७ दशलक्ष)तांत्रिक विश्लेषणानुसार असंघटित क्षेत्रातील सुमारे ४० दशलक्षहून अधिक कामगारांवर वाईट परिणाम झाला आहे. लहान दुकानदार आणि विक्रेते (१३ दशलक्ष), बांधकामातील मजूर ( ७ दशलक्ष), उत्पादन (३ दशलक्ष), वाहतूक (२ दशलक्ष), घरगुती मदत ( ४ दशलक्ष), घर स्वच्छता आणि रेस्टॉरंट स्वच्छता कामगार (३ दशलक्ष), पेंटर आणि बिल्डिंग स्ट्रक्चर क्लिनअर्स (३ दशलक्ष), स्टॉल आणि बाजारातील विक्रेते (२ दशलक्ष), रस्त्यावरील विक्रेते (२ दशलक्ष), कचरावेचक (१ दशलक्ष) असे मनुष्यबळ कार्यरत आहे. देशात सुमारे १२० दशलक्ष स्थलांतरित मजूर आहेत. हे मोलमजुरीने काम करतात. त्यांच्या उदरनिर्वाहावर टाळेबंदीने परिणाम झाला आहे.

हेही वाचा-रेल्वे प्रवास नाहीच! 30 जून पर्यंतचे सर्व प्रवासी तिकीट बुकिंग रद्द

नोकरभरतीत अशी झाली आहे घट
नोकरभरतीत अशी झाली आहे घट
प्रवास आणि आदरातिथ्य – ५६ टक्के
किरकोळ विक्री क्षेत्र – ५० टक्के
वाहन उद्योग – ३८ टक्के
औषधी – २६ टक्के
विमा – ११ टक्के
सॉफ्टवेअर – ११ टक्के
बँकिंग आणि वित्तीय सेवा – ९ टक्के

झी एन्टरेमेंटच्या महसुलात जानेवारी ते मार्चदरम्यान २८ टक्के घसरण झाली आहे. तर सन टीव्हीच्या महसुलात २० टक्के घसरण झाली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीसने मार्चमध्ये नोकरभरतीत ९ टक्क्यांनी कपात केली आहे. तर ओयो हॉटेल्स आणि होम्सने मनुष्यबळात १६ टक्के ( ४ हजार कर्मचारी) कपात केली आहे.

ओलाने मनुष्यबळात ८ टक्के, क्विकरने (Quikr) ९०० कर्मचारी कमी केले आहेत. रिटेल्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आरएआय) आकडेवारीनुसार किरकोळ क्षेत्रातील ४० टक्के कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत.

रोजगाराची संख्या
ई कॉमर्स – १४.५ लाख
अन्नप्रक्रिया उद्योग – ६९.९ लाख
किरकोळ विक्री क्षेत्र- ४७४ लाख
पर्यटन – ५०० लाख
बांधकाम उद्योग – ६६२ लाख

Tags: JobsOnline JobsUnemployment
Previous Post

भारताने चीनला टाकलं मागे; कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 हजार पार

Next Post

अकोल्यात आज सकाळच्या अहवालात झिरो पॉझिटिव्ह,ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १०१

RelatedPosts

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Next Post
akola corona positive update report (1)

अकोल्यात आज सकाळच्या अहवालात झिरो पॉझिटिव्ह,ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १०१

leopard

शेतातील विहिरीत बिबट्या पडला, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.