• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, November 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वानच्या पाण्यासह, बटालियन बाबत आमदार भारसाकळे शेतकऱ्यांनची दिशाभूल करीत आहेत,पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांचा आरोप

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
वान धरण
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील वानधरणाच्या पाण्यासह भारत राखीव बटालियन कॅम्प बाबत आमदार प्रकाश भारसाकळे वारंवार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. आम्हाला स्थगिती नव्हे तर सदर शासन निर्णय रद्द पाहिजे ,स्थगिती मिळवू शकता तर शासन निर्णय रद्द का करू शकत नाही स्थगितीच्या नावा खाली आमदारानीं शेतकऱ्यांनच्या तोंडाला पाने पुसले असा घणाघाती आरोप करून आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी बांधव सामूहिक निर्णय घेणार असल्याचा इशारा तेल्हारा येथे 26 सप्टेंबर ला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला आहे.

वारी हनुमान सागर धरणातील पाणी शासनाने अकोला करिता आरक्षित केले तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा हि शेतकऱ्यांची मुख्य मागणी असल्याने त्यावर स्थगिती नाही. तर रद्द आदेश पाहीजेत स्थगितीच्या नावाखाली आमदार प्रकाश भारसाकळे वारंवार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्यांची मागणी रास्त असून त्यासाठी तालुक्याच नव्हे तर संपूर्ण आकोट मतदार संघात अनेक आंदोलने झाली. वान धरण हे लाभधारक शेतकऱ्यांचे शेती सिंचन व्हावे या मुख्य उद्देशाने केले गेले. परंतु या धरणाचे पाणी विविध योजनेसाठी वापरले जात आहे तसेच शासनाने इतर पर्याय न शोधता सद्या अकोला करिता आरक्षित केले. यामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिचनाचा प्रश्न निर्माण झाला तालुक्यातील बहुतांश गावत पाणी टंचाई आहे, असे असताना शासनाने अकोला करिता पाणी आरक्षित करण्याबाबत जो निर्णय घेतला तो रद्द व्हावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

त्यासाठी शेतकऱ्यांनी सुरूवातीला शेकडो शेतकऱ्यांनची बैठक घेतली त्या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरवून शेकडो शेतकऱ्यांनच्या स्वाक्षरीचे जिल्हाधिकारी अकोला यांना सदर आरक्षण रद्द करण्याबाबत निवेदन दिले व शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली त्यानंतर अकोट विधानसभा मतदारसंघ कडकडीत बंद झाला व तेल्हारा शहरात तहसीलदार कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. त्यावर सुद्धा शासनाने कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यासाठी गावागावांत शेतकऱ्यांच्या मागणी वरून तालुक्यातील बहुतांश सरपंच यांनी शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला पाठींबा देऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व अनेक ग्रामपंचायत ने सदर शासन निर्णय रद्द करण्याबाबत ठराव घेतले त्या ठरावाच्या प्रतिचे निवेदन लवकरच जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांनि केलेल्या आवाहना नुसार तेल्हारा शहरासह गावोगावी आमदार भारसाकळे यांना गावबंदीचे बोर्ड लावण्यात आले होते.

कुठ तरी शेतकऱ्यांनचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचल्या जात असल्यामुळे पत्रकार परिषद घ्यावी लागली असे शेतकऱ्यांनी सांगितले तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथे होणारा भारत राखीव बटालियन कॅम्प अकोला तालुक्यातील सिसा उदेगाव हिंगणा शिवारात पळविण्यात त्या नंतर वानचे पाणी सुध्दा पळविण्यात आले रस्त्याची दयनीय अवस्था झाली अशा प्रकारे मतदारसंघाची पार वाट लावण्यात आली पाणी व बटालियन कॅम्प पळवून जाऊ दयायचा व नंतर तूर्त स्थगिती आणायची अशी बनवाबनवी सुरू आहे. स्थगिती ही विशीस्ट कालावधी करिता असते निवडणूक झाली की उठविल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी मूर्ख बनवू नये, स्थगिती मिळवता येते तर शासन निर्णय रद्द का केले नाहीत हा आमचा प्रश्न आहे. वान मधील अपुऱ्या कर्मचाऱ्यांनमुळे सिचन होऊ शकले नाही ,केवळ चार पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वान धरण सुध्दा सुरक्षित नाही ,कॅनालची दुरुस्ती नाही इतक्या वर्षांपासून कर्मचाऱ्यांनचे रिक्त पदे भरण्याकरिता आमदारांनी कधी प्रयत्न केले नाहीत. फक्त पाण्यासह बटालियन पळवून जाऊ दिले या साठी सुरू असलेले आंदोलन हे कुठल्याही राजकीय हेतूने नसून ही हक्काची लढाई आहे. शेतकऱ्यांनच्या काळजाचा तुकडा असलेली जमीन कॅनाल करिता फाडली परंतु भविष्याची स्वप्न पाहत असतानाच अचानकपणे दरोडा टाकून स्वप्न भंग केली. बटालियन मुळे तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळेल तेही स्वप्न भंगले एवढा मोठा अन्याय सहन करण्याची क्षमता आता राहिली नाही. त्यामुळे कधीही रस्त्यावर न उतरणारा शेतकरी शेतमजूर एवढ्या मोठ्या संख्येने एकवटून आंदोलनात उतरला आहे. सत्ताधाऱ्यानी याची दखल घेतली नाही ही खंत आहे.

आमदारांसह शासन कर्त्यांनी सदर शासन निर्णय रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांनच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे आकोट मतदार संघातील समस्त शेतकरी बांधव निवडणुकीत सामूहिक निर्णय घेणार व ते कुणाच्या पथ्या वर पडेल हे वेळेचं ठरवेल या साठी मोठे जनसंपर्क अभियान राबविण्यात येऊन जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. आमदारांच्या म्हणण्यानुसार २०ते २५गावांच्या बहिष्काराचा कुठलाही फरक पडत नाही, तो आता नक्कीच दिसेल असे सुध्दा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी पत्रकार परिषदेला ,राम कडू,श्रीकृष्ण ठाकरे,श्रीराम ठाकरे,योगेश बिडवे, योगेश विचे, विष्णू मल्ल,गणेश कोरडे,हरिदास वाघ,मंगेश घोंगे, दीपक अहेरकर ,दिलशाद शाह, छोटू चितलांगे, सुनील नेमाडे,गणेश कडू,अमोल शेळके,लुकमान शाह, भास्कर आमले,शिवराज नेमाडे,वसंतराव बदरखे,जगन्नाथ दामधर, प्रशांत लोनाग्रे,चेतन वाघ, विनोद वसतकार, शिवाजी पिंजरकर, उमेश आंबूसकर ,चेतन इंगळे, गणेश अवचार ,प्रदीप अवचार ,विठ्ठल अवचार ,अशोक वानखडे,संतोष वानखडे, श्याम वानखडे, यांच्या सह तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Tags: आमदार प्रकाश भारसाकळेबटालियनभारत राखीव बटालियन कॅम्पवानधरण
Previous Post

अकोट मतदारसंघात प्रहार उतरणार रिंगणात, मोर्चेबांधणी सुरू

Next Post

सततच्या पावसाने तेल्हारा शहरात घराची पडझड, तलाठ्यांकडून सर्व्हे सुरू

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
तेल्हारा

सततच्या पावसाने तेल्हारा शहरात घराची पडझड, तलाठ्यांकडून सर्व्हे सुरू

Sajid Khan

अमरावतीच्या साजिद अली यांची इंडिया शायनिंग स्टार पुरस्कारांसाठी निवड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.