अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज सोमवार दि. 05 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 250 तक्रारी प्राप्त झाल्या. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही तक्रारकर्त्याना दिला. आणि उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ,जिल्हा पोलीस अधीक्षक एम, राकेश कलासागर, जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, अभयसिंग मोहिते, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे,शरद झांबरे,रवि लोखंडे, प्रविण साखरे,आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिका-यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
मागील सभेत प्राप्त झालेल्या जुन्या तक्रारींचा विभागवारआढावा पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेतला. यात महसुल, जिल्हा परिषद , मनपा , पोलीस विभाग , महावितरण , कृषी , सहकार आदी विभागाचा समावेश हेाता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागाच्या तक्रार कर्त्यांचा नावाचा पुकारा केल्यानंतर प्रत्यक्ष संबधीत विभागाच्या अधिका-यांसमोर समक्ष तक्रार कर्त्यांची तक्रार जाणून घेवून या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अनुपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते, तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिका-यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
जनतेकडून प्राप्त झालेल्या विविध विभागांच्या समस्या विषयक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन पालकमंत्री स्वत: प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करणार आहेत. तसेच तातडीचेकामे 15 दिवसाच्या आत पुर्ण करावी असे निर्देश संबंधीताना यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 250 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग – 96 तक्रारी, पोलीस विभाग—27, जिल्हा परिषद– 52, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था -03, महानगर पालिका– 12, अग्रणी बँक – 06, विद्युत विभाग –11, भूमी अभिलेख – 02, कृषी विभाग – 23 , जात पडताळणी समिती – 03, सार्वजनिक बांधकाम विभाग -01, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी – 01, व इतर 13 अशा एकुण 250 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या